Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून..

८ फेब्रुवारी १६६५ _______________________________________ इ.स १६६५ मार्च १४. कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट. "फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले." -शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४ _________________________________________ "शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले." -जेधे शकावली _________________________________________ "बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना केलें.बसनूरची मत्ता अगणिंत माल जडजवाहिर कापड जिन्नस घेऊन आपले देशास आले. -सभासद बखर ___________________________...