Skip to main content

शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून..

८ फेब्रुवारी १६६५
_______________________________________
इ.स १६६५ मार्च १४.
कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट.
"फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले."
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४
_________________________________________
"शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले."
-जेधे शकावली
_________________________________________
"बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना केलें.बसनूरची मत्ता अगणिंत माल जडजवाहिर कापड जिन्नस घेऊन आपले देशास आले.
-सभासद बखर
_________________________________________
"सिंधुदूर्गी तमाम आरमार जहाजे आणून मावळे जमाव घेऊन जहाजांत बसून पेठ बसनूर प्रांत गोकर्ण समुद्र तीर बंदर मोठें बिदनूरकरांचे होतें,ते मारिले,बहुत मत्ता द्रव्य सांपडलें.साहुकार धरुन मालमत्ता घेऊन रायगडास कार्य सिद्ध करुन आले."
-मराठ्यांची ९१ कलमी
_______________________________________
"मग तेथून बेदनूरी सीवाप्पानाईक म्हणोन राजा होता.त्याचे शहर बेदनूर म्हणोन थोर नामांकीत दर्याकिनारा होतें.तेथील पालद आणोन वर घाट जाता तो मार्ग नाही म्हणोन आपली पाणीयातील जहाचे आणोन सिद्ध करोन आपण व हशम लोक जहाजांत बसोन निघाले.ते येकायेकी दिवस उगवावयासी बदनूक शहरास लोक समव्त दाखल होऊन,ते शहलचे लोक बेफाम होते;तो येकायेकी शहरचे मजितीत जाऊन लोक समवेत उतरुन कुल शहर मारिले व येक दिवस लुटोन फना केलें.
-शेडगांवकर भोसले बखर
_______________________________________
"खासा स्वारी शिंदीदुर्ग मालवण हेथे येऊन,आरमाराची तयारी करवून,दहशत,दबदबा आले,हे ऐकून शत्रुसैन्य घाबरले.
-श्रीशिवदिग्विजय बखर
_______________________________________
"हसनूर,प्रांत(बिदनूर) शहर मातबर दर्याकिनारा आहे.तेंथें बहूत द्रव्याधिपती आहेत म्हणून समजलियावरि बातमी आणून स्वारी करावी,शहरे मारावीं,प्रांत घेऊन ठाणीं घालावीं,असे महाराजांंनी चित्तांत आणूव,ते समयी सारे आरमार सिद्ध करुन,आपणहि थोरले पास त्याजवरी बसोन,दर्यांतून जावे असा सिद्धांच करुन खुषकीने फौजा रवाना केल्या आणि मालवणावरुन दर्यामार्गेच जाऊन हसनूर पेठ असावध होती,तेथे जाऊन पेठ लुटली.प्रांतही लुटला.तीन चार दिवस स्वारी तेथेंच राहून सर्व मत्ता जाहाजावकि चढविली.सुरतेचेसारखेच शहर होते.दोन तीन करोडींचा विषय सांपडला..हें पाहून शिवाप्पा नाईक बिदनूरकर संस्थांनी होते.त्यास बहूत भय प्राप्त होऊन(त्यांनी)वकील पाठविलें आणि महाराजांस नजराणा पोशाख,जवाहीर,लाख रुपये नख्त नजर ऐसे पाठविलें आणि तह ठरवून महाराजांचे दर्शनास आले.दरसाल खंडणी तीन लक्ष देत जावी,ऐसा ठराव केला.(महाराजांनी)वकिलीस उमाजीपंत आपणांकजून ठेविले.
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
"इ.स. १६६५ एप्रिल ६.पोर्तूगीज व्हाईसराय-शिवाजीराजे
कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं.त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले.त्यांनी तुमची जहाजें झरुन आणूंन बंदरांत ठेवली.परंतू तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५२
_________________________________________
"इ.स. १६६५ एप्रिल १४.कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया
सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की,शिवाजीराजांपासून सुरत सुरक्षित आहे.परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत.बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्याने जाऊन आले.
-शिवकालान पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६
_________________________________________
इ.स. १६६५ जून २९.डाग रजि. रेसिडेंट लींडर्स(वेंगुर्ला)-बटेव्हिया.
शिवाजीराजांचा लुटमारीचा क्रम पूर्ववत चालू आहे.मागलें पतेर रवाना झाल्यानंतर त्यांनी कानडा प्रांतावर हल्ला करुन ८० हजार गिल्डरची लूट मिळविली.त्याचप्रमाणें डच कंपनीसाठी माल खरेदी तरावा म्हणून काशीबा व संतुबा शेणवी ह्या वेंगुर्ल्याच्या प्रसिद्ध व्यापार्यांनी पाठविलेले ५०० होनहम त्यांनी लुटले.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६
_________________________________________
______वरील अस्सल समकालीन साधनांचा क्रम आपण पाहिला.शिवाजीमहाराजांनी बसरुर(बेदनूर) वर स्वारी केल्याचे हे उल्लेख आहे.१६७४ मध्ये महाराज उत्तरेस सुरतेवर चालून गेले आणि फेब्रुवारी १६६५ मध्ये बसरुरवर चालून गेले.इ.स.१६६४ डीसेंबर मध्ये महाराज हुबळी फोंडा पर्यंत दक्षिणेकडे आले.मसुरा,आचरा,कुडाळ,सोंदे ह्या राज्यांची अर्थात स्वराज्याच्या सिमेवरची पोर्तुगिज इंग्रजांची चाललेली अधाधुंदी थांबविण्यासाठी किल्ले सिंधुदूर्गाची निर्मिती केली.पण जानेवारी १६६४ च्या सुरतेच्या छाप्यामधील धन सिंधुदूर्गच्या कामास कमी पडत आहे.हे लक्षांत आल्यावर महाराज आपल्या वडिलोपार्जित होय वडिलोपार्जित जहागिर सिमेवर असलेल्या केळदी राज्यांतील बसरुरवर चालून गेले.आता म्हणाल की बसरुर हि महाराजांची वडिलोपार्जित जहागिर कशी तर यास श्री शिवदिग्विजय बखर साक्ष देतेय.की शहाजीराजेंनी या पुर्वी बसरुरवर मोहिम करुन हा प्रांत जिंकला होता.
"शके १५८६ पादशाही हुकूम बिंदनूरकरांचे पारिुत्य करणें,म्हणोन आला.त्यावरुन शहाजीराजे यांणी फौज सरंजाम तयारी करविली.विठोजीराजे व शरीफजीराजे यांचा वंश अद्यापि चंदावर प्रांती आहे.शहाजीराजे यांणी चिरंजिव व्यंकोजीराजे यांस,सर्वांची निरवणूक करुन,आपण कूच-दरकूच बिदनूर प्रांती आले.बिदनूरकरहि तयार होऊन संमुख आले.उभयतांची गांठ पडोन लढाई सरहद्दीवरी बिदनुरकरांची,मोठी कजाखिची जाली.बिदनूरकरांचे सरंजामाहून (शहाजी)राजांचा सरंजाम फार मोठा.एक माणूस बिदनूकरांचे तर राजांकडील दहा,असे होण्यामुळे हतवीर्य होऊन,(बिदनूरकर शहाजी)राजांस शरणागत आले.ते समयीं विजापूरकरांकडील महाल घेतला.तो सोडून सरकारांत नेमणुकेप्रमाणे निसबतीस लागला.बिदनूरकरांचा प्रांत राजे यांणी स्वेच्छेकरुन उपजीवनार्थ रक्षिला तो वेगळा करुन,बाकी दरोबस्त आपला खालिसा केला."
-श्री शिवदिग्विजय बखर
________याचबरोबर बसरुरच्या मोहिमेस आणखी एक महत्वाचे कारण होते.ते हि शिवदिग्विजय बखरींत आले आहे.तो पाहूयात.
"बिदनुरकरांचे स्वारीमुळे(शहाजीराजांचा)नाश झाला,असी महाराजांची कल्पना होऊन शिवाप्पानाईक पाळेगार बिदनूरकर ह्यास पत्र महाराजांनी पाठविलें कीं,आम्हासी रुजू राहून चाकर म्हणवावें व दोन जागा आहेत?(कनकग्री,अनागोंदी,कंपली)त्या द्याव्या व चाकरीस यावे.न आल्यास चाकरीचे फौजेऐवजी करमार द्यावा.ह्याप्रमाणे तुमचे विचारास आल्यास बचाव करुन घ्यावा;नाहीं तरी तुम्ही आपली तयारी करणें
तें पत्र पाहून,शहाजीराजांसी रुजू होऊन,(आमच्या मुलुखापैकीं कांही) मुलुख दिल्हा.त्यांणी(शहाजीराजांनी आमच्या) पोटापुरता ठेविला,त्यास उपदेरव देण्याचा हेतू चिरंजीव(शिवाजीराजे) कर्ते झाले.ऐशास हे मर्द आम्ही नामर्द आहों कीं काय?असे बोलून (शिवाजीमहालाजांच्या) पत्राचा अव्हेर केला.
-श्रिशिवदिग्विजय बखर
_______शहाजीराजांस आदिलशहाचा हुकूम आला की बिदनूरकरांचे पारिपत्य करने.त्याप्रमाणे शहाजीराजे बिदनूरवर चालून गेले.तो प्रांत घेतला.त्यांच्या पोटा पाण्यापुरता कसबा तेथे राखला.त्यांना जिवदान दिले.बाकीचे राज्य खालसा केले.पुढे शिवाजीराजांनी आपल्या कारकिर्तीत वडीलोपार्जित जहागिरीवर हक्क सांगत तात्कालीन बेदनूरचा राजा शिवाप्पा नाईक ह्याला पत्र लिहिले.परंतू,त्याने या पत्राचा अपमान केला.उलट तो म्हटला की,
शहाजीराजांनी आम्हास राज्य दिले.त्यांचे चिरंजीव उपद्रव करतायेत.तेच मर्द आहेत मग आम्ही काय नामर्द आहोत काय?
आणि..
या सह्यशिखरांचा,गिरीशिखरांचा स्वामी खवळला व थेट बेदनूरकरांवर चालून गेला.मध्ये गोवा राज्याची सिमा लागते.आरे टाप झाली नाही महाराजांची तरांडी,तारवं,जहाज आडविण्याची.महाराज दिवस उगवते गेले आणि बिदनूर मारले.
_______वरील पत्रव्यावहार निट वाचा.गोव्यात हिंदूंनी पोर्तुगिजांचा धर्म स्विकारावा म्हणून एक्वीझिशनच्या नावाखाली कित्येक कित्येक अत्याचार केले.सत्ता चालविली.हिंदुंच्या कत्तला केल्या.तो एक्युजिशनचा टेबल अजूनही आहे.त्याला बांधून हिंदूंना जिवंत जाळले जायचे,जिवंत अंगावर उकळते तेल ओतले जायचे,जिवंतच कापले जायचे.त्या पोर्तुगिजांची पुढे महाराज हयात असेपर्यंत टाप झाली नाही.
____आणखा एक उदाहरण-
"गोव्याचा व्हाईसरॉय कोंदि द सांव्हिसेंति मेला असून,आतां त्याचे जागीं तीन आधिकारी काम करितात.व्हाईसरॉय मरण्यापूर्वा त्यानें बारकाईंने तपास केला असता,सर्व शहरांत मिळून शिवाजीराजांचे ४-५ शें लोक लपून राहिलेले आढळले.तेव्हा, स्वहस्तांने शिवाजीराजांच्या वकिलाच्या दोन-तीन थोबाडींत देऊन आला आणि त्या सर्व कैद्यांना त्यानें गोव्यातून हद्दपार केले.हे ऐकून शिवाजीराजांनी ८-१० हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वारांनिशीं गोव्यावर स्वारी करण्याचे जाहीर केले.
-पत्र क्रमांक १२२८
"शिवाजीराजांनी सुमारे चार पाचशें लोक गोव्यात घुसडून दिले होते.थोड्याच वेळांत ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्रीं एकदम उठाव केला असता तर गोव्याचा कोणताहि एक दरवाजा ताब्यांत घेऊन,पोरेतुगिजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्याचे पूर्वींच,शिवाजीराजांचे लोक आंत शिरुन त्यांनी गोवा काबीज केंले असते.परंतु शिवाजीराजे गोव्यापर्यंत आल्यावर,आपला कट उघडकीस आला;आपले लोक पकडले गेले आणि पोर्तुगिज लोकहि सज्ज होऊन राहिले;हे पाहून शिवाजीराजे आपल्या गोवा सरहद्दीवरील मुलुखाचा कडेकोट बंदोबस्त करुन राजगडला परत आले."
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं.१२२८
_______महाराजांनी आपले काही लोक गोव्यात घुसवले होते.नंतर कट उघडकीस आला.गोव्याचा व्हॉईसरॉय मेला तर सर्वांना संशय होता कि मराठ्यांनीच त्याला विषबाधा केली.या सर्व पत्रव्यावहारावरुन व साधनांवरुन लक्षात आलेच असेल.
मराठ्यांचा महाराजांचा दरारा काय होता तो.
एकदा एकदा पन्हाळ्यावर युनियन जॅक लावून तोफा डागल्या तर महाराजांनी सबंध राजपूरची वखारच खणून काढली.तो दबदबा होता त्या काळात राजांचा.
कधी गुगल map काढून बघा कुठे पुणे,कुठे रायगड,कुठे तो गोवा,मालवण,कुठे ते बिदूनर प्रांत मग नक्की कळेल तुम्हाला वाघाचा दबदबा कसा व कुठ पोहोत असतो.
"आणि.........
आम्ही त्यांच्या सिंहासनस्थित मेघडंबरीवर चढून त्यांच्या सोबत सेल्फी काढतो.
इतकी आमची मजाल..!"
धन्यवाद..!
संदर्भ-
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १,२
सभासद बखर
मल्हार रामराव चिटणिस बखर
जेधे शकावली
मराठ्यांची ९१ कलमी बखर
शेडगांवकर भोसले बखर
रणपती शिवाजी महाराज-आप्पा परब
सिंधुदूर्ग-आप्पा परब
संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)
Image may contain: 1 person

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...