Skip to main content

कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे

कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे
यांचा शिवाजीराजा नाहीए
संभाजी ला आम्ही मारले आहे
राजाराम पण आता जिवंत नाही
संभाजीची बायको व मुलगा आमच्या ताब्यात आहे
पाच वर्षाच्या पोराला राजा करुन राजारामाची बायको ताराराणी काही हजार सैन्यानीशी आमच्या लाखाच्या वर सैन्यांशी दोन हात करतेय
इराण पासुन ते उत्तर दक्षिण हिंदुस्तान आमच्या बादशाह ला घाबरतो
पण हे मराठे........ आमच्या सैनिकांना स्वप्नात व घोड्यांना पण पाण्यात दिसतात
ह्यांची सहाशे - सातशे ची शिबंदी पुर्ण किल्ला आमच्या विस हजार सैन्या पुढे लढवते, वर आम्ही यांना जर खलीता पाठवला की गड ख़ाली करा नाहीतर जेव्हा जिंकेल तेव्हा तुमची पोर मारु बायको नासवु
पण ह्यांच पोर पण घाबरत नाय आणी बायका तो खलीता घालतात चुलीत
तेव्हा वाटत काय चीज आहे हे मराठे
मरायला ही तयार आणी मारायला लागले की पिवळा भंडारा लवलेले हे लोक आमच्या रक्ताने लाल होतात
शिवाजीची स्वामिनीष्ठा आणी संभाजी ची जीव गेला तरी शरण जायच नाय हि शिकवण, अशी मस्ती असलेले हे मराठे.....
आज आमचे बादशहा गेले
त्यांनी अनेक राजे संपवले पण त्यांना आज काफीर मराठ्यांनी संपवले
या ख़ुदा क्या लोग हे यह मराठे
कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही,
तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो,
तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो
कोणी ८० व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रुंना लोळवतो
तर कोणी मिसुरड न फुटलेल पोर पडणारे भगव निशाण सावरत विस एक गनिमांना मारतो
कोणी ७ वीर मराठे तीस हजार फौजेला भिडतात
तर कोणी ६० मावळ्यांना घेऊन गड जिंकुन देतात ..!
यांचे हे असामान्य बलिदान हे शिवाजी महाराजांनी केलेल्या महान कार्याची व संभाजी महाराजांच्या बलिदानाची खरीखुरी पावतीच होय..!

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...