Skip to main content

देशप्रेमी शिवराय : मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारास लिहिलेले पत्र

  इसिसने वर्ष २०२० पर्यंत भारतापासून युरोपपर्यंतचा भाग इस्लाममय करायचा मनोदय घोषित केला आहे. काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ?
नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा…
      शिवरायांचा आठवावा साक्षेप
      माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !
      छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकार्‍यांना पाठविलेले एक फार्सी पत्र दोन जुन्या पत्रसंग्रहांमध्ये समाविष्ट आहे. त्यावर तारीख नसली, तरी ते शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर लिहिले आहे, हे त्यातील उल्लेखांवरून स्पष्ट समजते. पत्राचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.
       गेली तीन वर्षे (औरंगजेबाचे) तालेवार उमराव या प्रदेशात येत आहेत. माझा मुलुख आणि माझे किल्ले काबीज करण्याचा हुकूम बादशाह त्यांना देतो. लवकरच काबीज करतो, असे उत्तर ते देतात. या दुर्गम मुलखात अफाट कल्पनाशक्तीचा घोडा दौडवणेही शक्य नाही. मग तो काबीज करणे तर दूरच. तरीही सत्य दडवून खोट्या गोष्टी लिहिण्यास त्यांना लाज वाटत नाही.
     (बादशहाने पूर्वी काबीज केलेले) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. माझी मायभूमी तशी नाही. तिच्यात २०० कोस लांब आणि ४० कोस रूंद अशा उत्तुंग डोंगरांच्या रांगा आहेत आणि ओलांडण्यास अवघड अशा नद्या आहेत. तिथे ६० किल्ले बांधले आहेत, ज्यांपैकी काही समुद्रकिनार्‍यावर आहेत.
     आदिलशहाचा उमराव अफझलखान मोठे सैन्य घेऊन जावळीस आला आणि मृत्यूमुखी पडला. जे घडले, ते तुम्ही प्रामाणिकपणे बादशहाला का कळवत नाही ? गगनचुंबी पर्वतांच्या आणि पाताळापर्यंत जाणार्‍या दर्‍यांच्या या मुलखात मोहीम करण्यास अमीरूल उमरा (शाहिस्तेखान) याची नेमणूक झाली. त्याने तीन वर्षे खपून बादशहाला कळवले की, माझा (म्हणजे शिवाजी महाराजांचा) पूर्ण पराभव झाला आहे आणि थोड्याच दिवसांत माझा मुलुख काबीज होईल. शेवटी या खोटेपणाचे फळ तो कसे पावला आणि नामुष्की होऊन परत गेला ते जगजाहीर आहे.
    माझ्या मायभूमीचे रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. आपली इज्जत राखण्यासाठी या उमरावांनी बादशहाला खोट्या गोष्टी लिहून कळवल्या असल्या, तरी ईश्‍वराच्या कृपेने, या विरक्त मनुष्याच्या प्रिय देशावर आक्रमण करणार्‍या कोणाच्याही इच्छेची कळी कधी उमललेली नाही.
     ज्या रक्ताच्या नदीतून कोणी मनुष्य आपली होडी पलीकडे नेऊ शकला नाही त्या या नदीपासून शहाण्या मनुष्याने दूर रहावे.
    या पत्रात महाराजांनी स्वत:चा उल्लेख विरक्त असा केला आहे. समर्थ रामदासस्वामींनी या जाणत्या राजाला लावलेले श्रीमंत योगी हे विशेषण किती सार्थ आहे.
– डॉ. अनुराधा कुलकर्णी, देशप्रेमी शिवराय

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...