Skip to main content

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

७. शिवचरित्र विसरण्याच्या कृतघ्नपणाचे दुष्परिणाम !

इंग्रज जेव्हा या देशात आले, तेव्हा त्यांनी रायगड ताब्यात घेतला व महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट केले. तसेच सर्व संस्थाने खालसा करून टाकली. रायगडावर केलेल्या बाँबहल्ल्यामुळे रायगड १८ दिवस जळत होता. रायगडावरील शिवाजी महाराजांनी बांधलेले आठ महाल इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकले. रायगडावरील सिंहासनाचे काय केले, ते माहीत नाही.
सर रिचर्ड टेंपल हे भारताचे गर्व्हनर होते. त्यांना एकदा विचारले, ‘‘औरंगजेब ७ लाख मुसलमानांची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. २५ वर्षे तो लढत होता; पण २५ वर्षांत त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट करता आले नाही. औरंगजेबाला ७ लाख माणसांच्या साहाय्याने प्रचंड दारूगोळा असतांना जे २५ वर्षांत जमले नाही, ते तुम्ही १०-१५ वर्षांत कसे काय साध्य केले ? इतक्या कमी शस्त्रांनी कसे काय हे साध्य केले ?’’ त्या वेळी रिचर्ड टेंपल यांनी दिलेले उत्तर अगदी मौलिक आहे. त्यांनी सांगितले, ‘‘जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, तेव्हा अवघ्या महाराष्ट्रातील लोकांना शिवचरित्राचे स्मरण होते. त्यानंतर त्याला सर्व लोक विसरले; म्हणून आम्हाला हा महाराष्ट्र प्राप्त झाला.’’
म्हणूनच, हिंदूंनो, आजचे राज्यकर्ते शिवचरित्र विसरले असले, तरी तुम्ही ते विसरण्याचा कृतघ्नपणा करू नका. शिवचरित्र विसरण्याचा परिणाम पराधीनतेत होतो, हे सत्य जाणा ! ते जाणून तुम्ही शिवचरित्रानुसार मार्गक्रमण केले, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ने आजच्या अंकातून केलेली शिवचरित्राची उजळणी श्रीकृष्णाच्या चरणी रूजू झाली, असे म्हणता येईल !
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].