Skip to main content

इतिहासात हरवलेला धारकरी - "संताजी जाधव"

संताजी जाधव हे नाव ऐकले की आपण बुचकळ्यात पडतो . संताजी घोरपडे. मग संताजी जाधव कोण ?
संताजी घोरपडे यांनी आपला आडनाव तर
नाही ना बदलले होते ? असे प्रश्न आपल्याला पडतील तर असे काही झाले नव्हते.
संताजी घोरपडे यांनी भल्या भल्यांना आपले आडनाव बदलायला लावले. ते आपला आडनाव कसे बदलतील. मग कोण
आहे हा संताजी जाधव त्याचे इतिहासातील महत्व काय संताजी जाधव हा धनाजी जाधव यांचा सुपुत्र.संताजी हे नाव धनाजीने आपला मित्र संताजीं च्या नावावर ठेवले. धनाजी
संताजींच्या युद्ध नितीने इतका भारावले होते
कि त्यांनी आपल्या मुलाचे नाव संताजी ठेवले आणि जसा तो वयात आला तसा तो स्वत्त
त्याला घेवून संताजीकडे आले आणि म्हणाला " संता सांभाळ तुझ्या भाच्याला, तुझ्यासारखा पराक्रमी बनव त्याला. आणि तुझे सारे गुण
त्याच्यात उतरव" " धना बेफिकीर रहा सिंहाचा छावा बनवतो त्याला तुलाही बदणार नाही." संताजी त्याला.आपल्या उराशी घेत म्हणाले. संताजी जाधव पिता धनाजी जाधावा प्रमाणे शूर आणि पराक्रमी होता.
चंदान्वंदन च्या लढाईत वाघाप्रमाणे लढला मोघलांनी घेरले तरी हत्यार खाली ठेवले नाही
अंगावर असंख्य जखमा झाल्या मराठ्यांनी याला कसा- बसा रणांगणातून परत आणले पण अंगावर असंख्य जखमांमुळे याचा
मध्यरात्री मृत्यू झाला. साऱ्या रात्रभर संताजी
घोरपडयांनी त्याला आपल्या मांडीवर घेवून
काढली.सकाळी धनाजी गढ चढून वर आले आणि त्यांनी पहिला प्रश्न केला "संता माझा पोर वाघासारखा लढला ना? लढाई अर्धवट सोडून
पळताना तर मारला नाही ना गेला ?" " अरे धना तुझा पोर वाघच होता रे आणि लढाईत पळून यायला तो काय मोघल होता मराठ्यांचा मर्द बच्चा होता जो जिंकण्यासाठी मेला "
संताजी.यानंतर संताजी आणि धनाजींनी खूप लढाया केल्या आणि त्या यशस्वीही करून दाखवल्या नंतर सेनापती या पदासाठी या दोघांच्यात जेव्हा वाद झाले तेव्हा संताजी
एकदा धनाजीला म्हणाला "धनसिंग अरे हे दिवस बघायला तुझा पोरगा संताजी इथे
नाही आहे पण जर तो असता तर तलवार घेवून
पहिली तुझी गर्दन छाटली असती कारण स्वराज्या विरोधात उठणारा प्रत्तेक बोट
वेळीच छाटावा असे मी शिकवले होते. आज जर तो वरुण बघत असेल तर त्याच्या मनाला काय वाटत असेल धनसिंग "खरेच जर
संताजी जाधव शेवटपर्यंत असता तर संताजी
घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यात झालेले वाद झालेच नसते. आणि त्यामुळे त्या औरंग्याला २७ वर्ष महाराष्ट्रात राहूच दिले नसते.....
|| जय भवानी, जय शिवाजी....|

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...