Skip to main content

Posts

लाहोरमध्ये मराठ्यांचा जरीपटका ध्वज फडकविणारे पराक्रमी वीर..!

स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठ्यांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते. सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठ्यांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठ्यांनी सर केली व मराठा फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मर...

अपरिचित इतिहास.

शिवरायांचे छावे आम्ही मनाप्रमाणे राहू,अमुच्या मर्जीविना झुंजण्या कोण सांगतो पाहू । तेज अनोखे पाहूनि दिपली आलमगिराची मती, नकार देणारे हे केवळ दोघे छत्रपती ।।

बारा खांबी मंदिर.....

एेतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून या ठिकाणच्या दुर्लक्षित बाराखांबी परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीताफळाचे झाड मुळासकट काढताना अनेक देवदेवतांच्या शेकडो शिल्प व शिलालेख सापडले आहेत.हे शिल्प बौद्ध की शिवकालीन आहेत,हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुरातत्त्व विभागाने अजून या मंदिराला भेट दिलेली नाही.त्यामुळे ही दुर्मिळ शिल्पे चोरीस जाण्याची भीती स्वयंसेवकांकडून व्यक्त होत आहे. अंबाजोगाई शहराजवळील स कलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून यालाच बाराखांबी म्हणतात कलात्मक व खास रूपगर्वितांच्या शिल्पामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिराची उभारणी शके ११५० म्हणजेच इ.स.१२२९ मध्ये झाल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.मध्ययुगीन कालखंडातील हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मंदिराची उभारणी सिंघनदेव यादवांचा सेनापती खोलेश्वराने केलेली आहे. मंदिराच्या शिलालेखातील अप्रतिम शिल्पे कर्नाटकातील एव्होळे मंदिराच्या स्थापत्य कलेशी साधर्म्य दाखवणारी आहे.मुळात सकलेश्वर मंदिर अवकाशातून शिवपिंडीच्या आकाराचे दिसते.

जय भवानी जय शिवराय

नौशाद उस्मान यांचे शिवाजी महाराजांन वरील अप्रतिम भाषण

Nitin Banugade Patil Powerfull Speech , Part -1 | शिवाजी महाराजांवरच जबरदस्त भाषण , भाग -१

अपरिचित मावळे.

शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या-छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले; परंतु स्वराज्य निर्माण करताना, अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन-मन-धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म 9 ऑक्टोबर 1665 (अश्विन शुद्ध 6 शके 1557) रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साता-याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दोन...