Skip to main content

Posts

एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते.

एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणार्या वीर शिवा काशीद यांचा उद्या पुण्यस्मरण दिन. वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन .... ! ! छायाचित्र - प्रशांत चव्हाण

उंबर खिंड लढाई .

समरभूमी उंबर खिंड !! एक गनिमी कावा !! उंबर खिंड लढाई . शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडव ून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला 'सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -' असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे 'तुंगारण्य'. अखेर खानाने रायबागनच...

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १९ जुलै १६५९

औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना पाठवलेला "मानाचा पोशाख आणि पत्र" शिवरायांना मिळाले. ➖ १९ जुलै १६७६ "छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह. ➖ "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! ➖ संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र"

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १८ जुलै १६८१

🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 🚩 १८ जुलै १६८१ सिद्दीच्या हालचालींना पायबंद घालावा या दृष्टीने मराठ्यांनी १८ जूलै रोजी पहाटे उंदेरीवर हल्ला केला. मराठे आणि सिद्दी ४ तास सतत एकमेकांवर हल्ले करीत होते. त्यात काही माणसे पकडली गेली पण अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला. 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड लेखक -: सूरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण

सुधागड

भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली." शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झा...

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १७ जुलै १६५३

छत्रपती शिवरायांनी "सिद्धेश्वर ब्रम्हे" यांना वर्षासन दिले. १७ जुलै १६७७ ६ जुलै रोजी झालेल्या "छत्रपती शिवराय" आणि मदुरै चा नायक "चौकनाथ" यांच्यात झालेल्या तहानुसार चौकनाथ तब्बल एक लाख रूपयांची खंडणी घेऊन आपल्या वकीलामार्फत शिवरायांपुढे हजर. "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण

🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १३ जुलै १६६०

सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे.उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली.आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिं डीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले.खळाळणार्‍या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुह...