Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते.

एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणार्या वीर शिवा काशीद यांचा उद्या पुण्यस्मरण दिन. वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन .... ! ! छायाचित्र - प्रशांत चव्हाण

उंबर खिंड लढाई .

समरभूमी उंबर खिंड !! एक गनिमी कावा !! उंबर खिंड लढाई . शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडव ून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला 'सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -' असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे 'तुंगारण्य'. अखेर खानाने रायबागनच...

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १९ जुलै १६५९

औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना पाठवलेला "मानाचा पोशाख आणि पत्र" शिवरायांना मिळाले. ➖ १९ जुलै १६७६ "छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह. ➖ "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! ➖ संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात © "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र"

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १८ जुलै १६८१

🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 🚩 १८ जुलै १६८१ सिद्दीच्या हालचालींना पायबंद घालावा या दृष्टीने मराठ्यांनी १८ जूलै रोजी पहाटे उंदेरीवर हल्ला केला. मराठे आणि सिद्दी ४ तास सतत एकमेकांवर हल्ले करीत होते. त्यात काही माणसे पकडली गेली पण अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला. 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 🏇 🚩 संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड लेखक -: सूरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण

सुधागड

भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते. याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली." शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झा...

🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १७ जुलै १६५३

छत्रपती शिवरायांनी "सिद्धेश्वर ब्रम्हे" यांना वर्षासन दिले. १७ जुलै १६७७ ६ जुलै रोजी झालेल्या "छत्रपती शिवराय" आणि मदुरै चा नायक "चौकनाथ" यांच्यात झालेल्या तहानुसार चौकनाथ तब्बल एक लाख रूपयांची खंडणी घेऊन आपल्या वकीलामार्फत शिवरायांपुढे हजर. "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण

🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 १३ जुलै १६६०

सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे.उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली.आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिं डीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले.खळाळणार्‍या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुह...

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १२ जुलै १६६०

पन्हाळगडच्या वेढ्यातून पलायन महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. बाजीप्रभू निघाले. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली.वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा ए...

दुर्गराज राजगड:- संजीवन माची-

_____मोरोपंतांच्या देखरेखीखाली राजगडचे बांधकाम चालु होते.राजधानीचा गड, स्वराज्याची सुरुवात.या मुरुंबदेवाच्या डोंगरास खणत्या,पहारी लागल्या.श्री गणेशा झाला.राजधानीचा गड नव रुप घेऊ लागला.गडावरील इमारती,तट,बुरुंज यांना लागणारा दगड हा डोंगरावरील अनावश्यक भागास खणत्या,पहारी लावुन फोडुन उपलब्ध केला जाऊ लागला.राजगडाच्या तिन्ही माच्या संरक्षित केल्या जात होत्या.मोरोपंतांनी किल्ले राजगडाची पश्चिमेकडील माची वैशिष्ट पुर्ण बांधली.पश्चिमेकडील एक दीड मैल लांबीच्या डोंगरसोंडेवर अंती हेच बांधकाम दुहेरी केलेले आहे आणि जागोजागी असलेल्या बुरुजांचे बांधकामही दुहेरी केलेले आहे.अगदी शेवटी एका मुलभूत खडकावर बिनिचा बुलंद बुरुंज बांधलेला आहे.जागोजागी पाण्याची टाकी,शिबंदीची घरे,चिलखती तट,चिलखती बुरुंज,आळ दरवाजा,जुंझार बुरुंज,दैवत स्थाने,तटसरनोबत सदर,पायखाने इत्यादी बांधकामांनी ती माची सजली,संरक्षित केली. _____किल्ले मुरुंबदेवाच्या सन १६४८ ते १६६३ या बांधकामाच्या कालावधीत हिरामण बेलदाराची पालें त्या राजगडाच्या आसमंतात असणार्या गुंजवणी नदीकाठी पडली.राजगडाचे बांधकाम सुरु झाले.वास्तुविशारदाच्या देखरे...

मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला.

मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिगंत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. [ विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,---- "मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते एवढा वेग होता त्यांचा. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजी राजाने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-...

महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं जगातलं पहिलं चित्र

हे जगातलं महाराजांचं पहिलं असं चित्र आहे की जे चित्रावरून काढलेलं नाही, महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं आहे! हे बेंद्र्यांचं एक मोठं काँट्रीब्युशन आहे. बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे. ती जेव्हा त्यांनी शोधून काढली तेव्हा तिचा दर्गा झाला होता.