Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

बहिर्जी नाईक || Bahiraji Naik

बिरबलापेक्षा ही जास्त चातुर्य असलेला स्वराज्यातला मावळा बहिर्जी नाइक. मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत...

इतिहासात हरवलेला धारकरी - "संताजी जाधव"

संताजी जाधव हे नाव ऐकले की आपण बुचकळ्यात पडतो . संताजी घोरपडे. मग संताजी जाधव कोण ? संताजी घोरपडे यांनी आपला आडनाव तर नाही ना बदलले होते ? असे प्रश्न आपल्याला पडतील तर असे काही झाले नव्हते. संताजी घोरपडे यांनी भल्या भल्यांना आपले आडनाव बदलायला लावले. ते आपला आडनाव कसे बदलतील. मग कोण आहे हा संताजी जाधव त्याचे इतिहासातील महत्व काय संताजी जाधव हा धनाजी जाधव यांचा सुपुत्र.संताजी हे नाव धनाजीने आपला मित्र संताजीं च्या नावावर ठेवले. धनाजी संताजींच्या युद्ध नितीने इतका भारावले होते कि त्यांनी आपल्या मुलाचे नाव संताजी ठेवले आणि जसा तो वयात आला तसा तो स्वत्त त्याला घेवून संताजीकडे आले आणि म्हणाला " संता सांभाळ तुझ्या भाच्याला, तुझ्यासारखा पराक्रमी बनव त्याला. आणि तुझे सारे गुण त्याच्यात उतरव" " धना बेफिकीर रहा सिंहाचा छावा बनवतो त्याला तुलाही बदणार नाही." संताजी त्याला.आपल्या उराशी घेत म्हणाले. संताजी जाधव पिता धनाजी जाधावा प्रमाणे शूर आणि पराक्रमी होता. चंदान्वंदन च्या लढाईत वाघाप्रमाणे लढला मोघलांनी घेरले तरी हत्यार खाली ठेवले नाही अंगावर असंख्य जखमा झाल्...

‘असे घडवा’ हे शिवाजीराजांचा इतिहास सांगतो || chhatrapati shivaji maharaj history always tell "do as like"

आजचा विषय संपूर्ण राजकीयच आहे. शिवाजी राजे हे राजकारणीच होते व त्यांचे चरित्र म्हणजे सर्वस्वी राजकारणच आहे. परंतु इतरांचा इतिहास व शिवाजीचा राजांचा इतिहास यांत फरक आहे. इतरांचे इतिहास इतिहासजमा झाले, शिवाजी राजांचा इतिहास अजून कामाला येतो. म्हणूनच आपण ‘शिवजयंती’ साजरी करतो. प्रतापगडचे उदाहरण घेतले, तर शिवाजी अद्याप अनेकांना सतावतो हेही दिसते. इतरांचे इतिहास ‘इतिहासात असे घडले’ एवढेच सांगतात, पण शिवाजी राजांचा इतिहास ‘असे घडायला पाहिजे व असे घडवा’ हे सांगतो. भारतात ब्रिटिश राजवट आली, त्यावेळी विचित्र परिस्थिती होती. राष्ट्रीय जागृती नव्हती. वरचा सुशिक्षित वर्ग स्वामिनिष्ठ नागरिक होता. त्यावेळी इंग्रजांनी जो मराठय़ांचा इतिहास लिहिला त्यात मराठय़ांची केवळ बदनामी होती. ‘कुठून तरी विस्कटलेला पालापाचोळा एकत्र आला आणि त्याला आग लागून भडका उडाला’ असे मराठय़ांच्या इतिहासाचे चित्र त्यांनी रंगविले. पण आग कशी लागली? आणि भडका कोणाचा उडाला? त्यानंतर हळूहळू राष्ट्रीय जागृती झाली. लोकमान्य टिळकांनी ‘शिवजयंती उत्सव’ सुरू केला. देशात ब्रिटिशविरोधी वारे वाहू लागले. मग आमची मंडळी जागृत झाली...

इतिहास

....कित्येकांसाठी परीक्षेत पास होण्याचा विषय अन काहींसाठी आयुष्य.....शाळेच्या पुस्तकातून परीक्षेपुरते पाठ केलेले उतारे आयुष्यभर लक्षात राहतील अस कुणाला वाटल होत .पणचवथीच्या पुस्तकातला तो शिवरायांचा फोटो अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही .“ गड आला पण सिंह गेला “ हे वाक्य काळजावर कोरल गेलय .खिंड आपल्या रक्ताने पावन करून माझ्या राजाला अभिषेक वाहणारा वीर बाजींचा देह अजूनही लढताना दिसतो. अशी एक ना अनेक नाव कळायला लागल्यापासून ऐकली , समजली आणि जगली.बालवाडीत असताना बोबड्या बो लात कित्येकदा “ शिवाजी लाजा कि जय “ अस नकळत बोलून गेलो असेन.का? काही समजत नसताना , उमजत नसताना अस का व्हाव ?लहानपणी आईने जस शुभम करोति म्हणायला शिकवलं तसे शिवाजी महाराज हि शिकवले. माझ्या राजाला जिजाऊनी भले राम – कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या असतील पण मी मोठा होताना आईने मला शिवबाच्या गोष्टी सांगितल्या. आईने जशी भवानीमातेची पूजा केली तशी ती जिजाऊंची महती सांगायला विसरली नाही. अभिमन्यूने चक्रव्युहात प्राण दिला पण त्याच वेळी माझ्या शंभू राजांचा पराक्रम सांगायला ती विसरली नाही.इतिहासाचा अभ्यास पाठ्यपुस्तकातून फार...

गनिमीकावा....

लहानशा सैन्यानिशी कमीतकमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यानिशी फत्तेखानावर मात कशी केली शिवरायांनी जाणून घ्या.... विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला। त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू। त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या क ाठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ‘ सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही. अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास ...