Skip to main content

‘असे घडवा’ हे शिवाजीराजांचा इतिहास सांगतो || chhatrapati shivaji maharaj history always tell "do as like"

आजचा विषय संपूर्ण राजकीयच आहे. शिवाजी राजे हे राजकारणीच होते व त्यांचे चरित्र म्हणजे सर्वस्वी राजकारणच आहे. परंतु इतरांचा इतिहास व शिवाजीचा राजांचा इतिहास यांत फरक आहे. इतरांचे इतिहास इतिहासजमा झाले, शिवाजी राजांचा इतिहास अजून कामाला येतो. म्हणूनच आपण ‘शिवजयंती’ साजरी करतो. प्रतापगडचे उदाहरण घेतले, तर शिवाजी अद्याप अनेकांना सतावतो हेही दिसते. इतरांचे इतिहास ‘इतिहासात असे घडले’ एवढेच सांगतात, पण शिवाजी राजांचा इतिहास ‘असे घडायला पाहिजे व असे घडवा’ हे सांगतो.
भारतात ब्रिटिश राजवट आली, त्यावेळी विचित्र परिस्थिती होती. राष्ट्रीय जागृती नव्हती. वरचा सुशिक्षित वर्ग स्वामिनिष्ठ नागरिक होता. त्यावेळी इंग्रजांनी जो मराठय़ांचा इतिहास लिहिला त्यात मराठय़ांची केवळ बदनामी होती. ‘कुठून तरी विस्कटलेला पालापाचोळा एकत्र आला आणि त्याला आग लागून भडका उडाला’ असे मराठय़ांच्या इतिहासाचे चित्र त्यांनी रंगविले. पण आग कशी लागली? आणि भडका कोणाचा उडाला?
त्यानंतर हळूहळू राष्ट्रीय जागृती झाली. लोकमान्य टिळकांनी ‘शिवजयंती उत्सव’ सुरू केला. देशात ब्रिटिशविरोधी वारे वाहू लागले. मग आमची मंडळी जागृत झाली. राजवाडे, साने, पारसनीस उभे राहिले. त्यांनी मराठय़ांचा खरा इतिहास लिहायला सुरुवात केली. पण हा इतिहास लिहिताना ‘हे सर्व घडले कसे?’ याच्यावर आमच्यात मतभेद निर्माण झाले. काही मंडळींनी तर ‘अफजलखानाचा वध’वर निष्कारण शेकडो पाने खर्ची घातली. तो मेला की त्याला मारला? मारणे बरोबर होते की नाही? त्यांत साधनशुचिता होती की नाही? एक ना हजार प्रश्न आणि चर्चा. ‘साध्य बुडाले तरी चालेल पण साधनशुचिता पाहिजे’, असे म्हणणारी मंडळी आजदेखील आहेत. अरे, ही चर्चा कशाला पाहिजे? मारला, स्वराज्यासाठी मारणे आवश्यक म्हणून मारला. त्यात काय बिघडले? परंतु ‘स्वराज्य बुडाले तरी हरकत नाही पण साधनशुचिता पाहिजे’, असे म्हणणारे निघाले म्हणजे मोठे कठीण होऊन बसते.
या सर्व इतिहासाकडे पाहण्याचा मात्र आमचा कम्युनिस्ट दृष्टिकोन आहे. एक म्हणजे इतिहास हा चक्रासारखा फिरतो असे काही मंडळी म्हणतात. म्हणून त्याची पुनरावृत्ती होते असे ते म्हणतात. पण इतिहास वरवर जरी चक्रासारखा दिसला तरी प्रत्येक वेळेला तो पुढे पुढे जातो, त्याच्यात प्रगती होते हा पहिला दृष्टिकोन. ‘काही काही दिवसांनी एक एक सत्पुरुष जन्माला येतो आणि तो इतिहास घडवतो’, असे काही म्हणतात. ते बरोबर नाही. समाजाला ज्या वेळी ज्याची जरूर असते त्या वेळी तो तसा पुढारी निर्माण करतो. परिस्थिती निर्माण झाली की गुण निर्माण होतात. म्हणून परिस्थिती अधिक गुण, समाजाची जरुरी अधिक त्याचे व्यक्तिमत्त्व मिळून पुढारी तयार होतो, हा आमचा दुसरा दृष्टिकोन. ब्रिटिशांच्या वेळी सुरुवातीला जसे राजनिष्ठ लोक निर्माण झाले तसे मोंगलांच्या काळात झाले. काही लोक औरंगजेबाला ‘सत्पुरुष’ म्हणायला लागले. तो सूत काढीत नव्हता पण हाताने टोप्या तर शिवत होता. आणि काही लोक व्यक्तिश: आचरणाने सत्पुरुष असतात पण प्रसंगी गोळ्या घालतात हे तुम्हाला माहीतच आहे.
शिवाजीचा दृष्टिकोन जातीय नव्हता, हिंदू-मुसलमानांचा नव्हता. कराने नाडलेल्या शेतकऱ्यांसाठी त्याने कायदे केले. शेतकऱ्यांना संरक्षण दिले, म्हणून ते शिवाजीभोवती-स्वराज्याभोवती जमा झाले. मधली पिळवणूक, मधले अडते नष्ट केले, म्हणून शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. स्वराज्य कशासाठी असते? केवळ झेंडावंदनासाठी? मग झेंडा राहतो वर आणि झेंडय़ाची काठी बसते पाठीत. शिवाजीचे स्वराज्य तसे नव्हते. ते खरेखुरे स्वराज्य होते. लोक त्याला हिंदवी स्वराज्य म्हणू लागले. म्हणून शिवाजीच्या कार्याचा जे जातीयवादी अर्थ लावतात ते चूक आहेत. मुसलमानांचा बीमोड होऊन हिंदूंचे राज्य झाले असा त्याचा अर्थ नव्हे. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.
शिवाजीने सांगितले, ‘सर्व जण स्वराज्याच्या एकीत या, पण काहींनी मानले नाही. त्यांनी एकीत येण्याचे नाकारले. तो म्हणाला, ‘स्वराज्याच्या एकीत आला नाहीत, फाटाफूट केलीत, कापून काढू, एकीत या, नाहीतर मरा.’ तेव्हा काही लोक म्हणाले, ‘अरे, हा शिवाजी मारकुटा आहे, िहसक आहे, लोकशाही मानेल की नाही, शंका वाटते’. पण शिवाजीने तिकडे दुर्लक्ष करून आपले कार्य चालूच ठेवले. त्याने जातगोत, पक्ष पाहिला नाही, सर्वाना सांगितले, ‘आपला शत्रू एक. ध्येय एक- मोंगलांना मारणे’ अशी स्वराज्यासाठी एकीची हाक त्याने दिली. तेव्हा सर्व जण एकीत आले.
शिवाजीने धर्म राखला पण धर्माधता आणली नाही, कुळांना संरक्षण दिले पण कुळींचा बडेजाव माजवला नाही. स्वराज्याची एकी केली आणि प्रतिगाम्यांची फळी फोडून काढली. त्याने मराठी ही राजभाषा केली. भाषेचा लढा हा जीवनाचा लढा आहे. शिवाजीने जनतेची, जीवनाची भाषा घेतली. स्वराज्याबरोबरच स्वभाषा साधली. तेव्हा ‘शिवकार्याचे स्वरूप’ लक्षात घेताना स्वराज्य, स्वराज्याची एकी, स्वराज्यातील जनतेचे हित, स्वराज्याची भाषा, स्वराज्याच्या रक्षणासाठी यंत्र व तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारे कारखाने व या कारखान्यांची किल्ली ज्या कामगार वर्गाच्या हाती तो कामगारवर्ग हे सर्व बरोबर घेऊन आपण पुढची वाटचाल केली पाहिजे, हेच शिवाजीच्या शिकवणुकीचे सार आहे.

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...