Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

केक कापण्यासाठी तलवारीचे वापर करणे कितपत योग्य....

मागच्या वर्षी नागराज मंजुळेंनी " सैराट " हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला.. अनेक नविन प्रयोग या चित्रपटात केले गेले. या चित्रपटाने उत्पन्नाचा उच्चांग गाठत चित्रपट सुष्टीत नवा इतिहास रचला..हा चित्रपट खुपच सुंदर....वादच नाही.. परंतू एक पुरातन शस्त्रसंग्राहक या नात्याने मला खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात पाटीलाच्या मुलाने तलवारीने केक कापणे होय..याचेच अनुकरण करीत प्रविण तरडे य ांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मुळशी पॅटर्न" यात तलवारीने ( घाणेरड्या) पद्धतीने केक कापून कहरच केला... ज्या राजाने ( महाराजांनी ) स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रे कशी असावी व कोणत्या प्रसंगी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचा अत्यंत सृक्ष्मपणे अभ्यास करून ते रणांगणात उपयोगात आणले असा या 'शिवबांचे' नाव आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात "सर्वात्तम राजा "म्हणून आदराने घेतले जाते... कारण त्याचा असलेला शस्त्र व दुर्ग अभ्यास होय..महाराजांच्या पुढे त्या समयी मोगल, अदिलशाहा, डच, इंग्रज व पोर्तुगीज इ. शत्रू असूनही कठीण प्रसंगी अतिशय संयमाने( नियोजन बध्दतेने) आणखी...

कोराईगड लोणावळा

जोडलेली खोट्या नाण्यांची छायाचित्रे पहावी

खोटेपणा कशात नाही हो ? प्रत्येकच गोष्टीत खोटेपणा आहे आणि त्याचा बाजार होउन लोक फसतात. शिवाजी महाराजांच्या नावावर तर हे मोठ्या प्रमाणात होते. शिवाजी महाराजांच्या नावावर लोक भावनिक होउन काहिहि आणि कितीही किमतीला घेतात हे विक्रेत्यांना माहीतीच असते. मी नाणे संग्राहक आहे त्यामुळे मी शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दलच बोलेन. प्रत्येक शिवप्रेमीला, इतिहास वाचकाला, अभ्यासकाला आणि नाणे संग्राहकाला शिवाजी महाराजांचे एक तरी नाण े संग्रही असावे असे वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण भटकत असतो. आपली त्यामागची भावना अत्यंत शुद्ध असते पण काही ठिकाणी आपला अभ्यास कमी पडतो. शिवरायांची नाणी मुळातच काहि फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि वस्तुच्या उपलब्धतेवरुन वस्तुची किंमत ठरते. उपलब्धता कमी असली की किंमत वाढुन त्याच्या नकला आणि त्याबद्दलचा खोटेपणा ही सुरु होतो आणि तसेच काहीसे ‘शिवराई’ बद्दल झालेले आहे. ‘शिवराई’ बद्दलच्या खोटेपणाचा बाजार हा आज सुरु झाला असे नाही शतकापुर्वीही असा खोटेपणा चालु होता, त्याबद्दल लवकरच मी स्वतंत्र लेख लिहिन. एखाद्या गोष्टीच्या शोधात भटकुन झाल्यावर जेव्हा ती गो...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...