Skip to main content

केक कापण्यासाठी तलवारीचे वापर करणे कितपत योग्य....

मागच्या वर्षी नागराज मंजुळेंनी " सैराट " हा मराठी चित्रपट प्रदर्शित केला.. अनेक नविन प्रयोग या चित्रपटात केले गेले. या चित्रपटाने उत्पन्नाचा उच्चांग गाठत चित्रपट सुष्टीत नवा इतिहास रचला..हा चित्रपट खुपच सुंदर....वादच नाही..
परंतू एक पुरातन शस्त्रसंग्राहक या नात्याने मला खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात पाटीलाच्या मुलाने तलवारीने केक कापणे होय..याचेच अनुकरण करीत प्रविण तरडे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "मुळशी पॅटर्न" यात तलवारीने ( घाणेरड्या) पद्धतीने केक कापून कहरच केला...
ज्या राजाने ( महाराजांनी ) स्वराज्य स्थापनेसाठी शस्त्रे कशी असावी व कोणत्या प्रसंगी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचा अत्यंत सृक्ष्मपणे अभ्यास करून ते रणांगणात उपयोगात आणले असा या 'शिवबांचे' नाव आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात "सर्वात्तम राजा "म्हणून आदराने घेतले जाते... कारण त्याचा असलेला शस्त्र व दुर्ग अभ्यास होय..महाराजांच्या पुढे त्या समयी मोगल, अदिलशाहा, डच, इंग्रज व पोर्तुगीज इ. शत्रू असूनही कठीण प्रसंगी अतिशय संयमाने( नियोजन बध्दतेने) आणखी करत या स्वराजाची उभारणी केली.
त्यात नक्कीच पट्टा, विटा, विविध प्रकारचे तलवारीचे या शस्त्रांचा मोलाचा वाटा होता हे निर्विध्यात सत्य होय...
दोन महिन्यांपूर्वी लातूरला शस्त्रप्रर्दशासाठी जाणे झाले.त्या भागातील एका खेड्यातील तरूण प्रदर्शन बघून माझ्या कडे आला आणि आपल्याजवळील असलेल्या पूर्वजांच्या तलवारीबद्दल गोडवे गावू लागला..त्याने मला अतिशय अभिमानाने सांगितले की तो ती तलवार वर्षातून एकदाच बाहेर काढतो( मला वाटले दसरा पूजनास) परंतू त्याने जे सांगितले ते उत्तर माझ्यासाठी खुप निराशाजनक होते.. हे महाशय त्यांच्या पूर्वजांनी रणांगणात वापरलेले शस्त्र आपल्या जन्मदिनाच्या दिवशी केक कापण्यासाठी वापरत असे...
आज दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने.....संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त आठ ते नऊ पुरातन शस्त्र संग्रहकांची नावे समोर येतील. ज्यांनी आपले आयुष्य पणास लावून हे शस्त्र संग्रहीत केला आहे.कारण जुने शस्त्र मिळविणे व जतन करणे हे अतिशय अवघड काम होय.आणि हेच ते मुठभर मावळे शस्त्रांच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तरूण पिढीसमोरील त्याचे प्रदर्शने भरावीत आहेत.
अठराशे अठरा साली भारतातील शेवटचे संस्थान ( मराठा) बुडाले.मराठ्यांनी पुन्हा आपल्या विरूध्द बंड करू नये म्हणून इंग्रजांनी सर्वसामान्यांच्या घरात शस्त्र ठेवण्यास बंदी घातली. अनेक शस्त्रे इंग्लंडला गेली.दुदैर्वाची गोष्ट म्हणजे ज्या इंग्लंड या देशाचा इतिहास चारशे ते पाचशे वर्षाच्या आधी जात नाही त्यांनी अनेक दुर्मिळ चिजा आपल्या भूमीतून नेवून जगातील सर्वात्तम अशा 'ब्रिटिश म्युझियम'मध्ये प्रदशिर्त करण्यात आले...त्यात शिवरायची तलवारीचासुध्दा समावेश आहे.
आज मी सांगितलेल्या वरील चित्रपटातून जर आपल्या शस्त्रांचा अशा अवमान होत असेल तर पुढच्या वीस एक वर्षात त्याचा इतिहास व अस्तित्व नक्कीच कायमचे पुसले जाईल.
आजच्या तरूण पिढीने त्या शस्त्रांचा कसा मान ठेवावा हे खरच ठरवावे..........जय शिवराय

लेखन - अभीजीत धोत्रे

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...