Skip to main content

जोडलेली खोट्या नाण्यांची छायाचित्रे पहावी

खोटेपणा कशात नाही हो ? प्रत्येकच गोष्टीत खोटेपणा आहे आणि त्याचा बाजार होउन लोक फसतात. शिवाजी महाराजांच्या नावावर तर हे मोठ्या प्रमाणात होते. शिवाजी महाराजांच्या नावावर लोक भावनिक होउन काहिहि आणि कितीही किमतीला घेतात हे विक्रेत्यांना माहीतीच असते. मी नाणे संग्राहक आहे त्यामुळे मी शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दलच बोलेन. प्रत्येक शिवप्रेमीला, इतिहास वाचकाला, अभ्यासकाला आणि नाणे संग्राहकाला शिवाजी महाराजांचे एक तरी नाणे संग्रही असावे असे वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण भटकत असतो. आपली त्यामागची भावना अत्यंत शुद्ध असते पण काही ठिकाणी आपला अभ्यास कमी पडतो. शिवरायांची नाणी मुळातच काहि फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि वस्तुच्या उपलब्धतेवरुन वस्तुची किंमत ठरते. उपलब्धता कमी असली की किंमत वाढुन त्याच्या नकला आणि त्याबद्दलचा खोटेपणा ही सुरु होतो आणि तसेच काहीसे ‘शिवराई’ बद्दल झालेले आहे.
‘शिवराई’ बद्दलच्या खोटेपणाचा बाजार हा आज सुरु झाला असे नाही शतकापुर्वीही असा खोटेपणा चालु होता, त्याबद्दल लवकरच मी स्वतंत्र लेख लिहिन.
एखाद्या गोष्टीच्या शोधात भटकुन झाल्यावर जेव्हा ती गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा त्या गोष्टिचा खरा-खोटेपणा जाणुन घेण्यात आपल्याला काही रस नसतो आपल्याला फक्त ती गोष्ट हवी असते आणि असेच काही लोकांच्या बाबतीत मी ऐकले आहे. बऱ्याच शोधानंतर आम्हाला शिवराई मिळाल्याचे मोठ्या खुशीने त्या लोकांनी सांगीतले पण त्या शिवराई “खोट्या” होत्या. इथे त्यांचे नाण्यांबद्दलचे ज्ञान कमी पडले. आपण आपले ज्ञान स्वतःच वाढवावे कधीही नाणी खरेदी करत असताना एखाद्या नाणकशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा त्याशिवाय नाणी घेउ नये.
नाणी अभ्यासक हुशार झाले तसे खोट्या नाण्यांचा बाजार चालवणारेही फार हुशार झालेत. अगदी मागील कित्तेक दशकांपासुन संग्रह करणारे तज्ञ लोकही यात फसत आहेत तर त्यापुढे आपण काय ?? शिवराई बद्दलच नाही तर असा खोटेपणा कित्तेक नाण्यांबद्दल आहे त्यामुळे नाणी खरेदी करतांना आपण सावध रहावे आणि खोटी नाणी कशी ओळखावीत ? यावर लिहीणे म्हणजे खोट्या नाण्यांचा बाजार चालवणाऱ्यांना हुशार करणे होइल.
हि खोटि नाणी कोण बनवतं ? कुठे बनवतं ? याबद्दल काही माहीती नाही. पण पुण्याच्या जुन्या बाजारात ही नाणी विकली जात असल्याचे मागे कुनीतरी सांगीतल्याचे आठवते. तसेच काहींना हि नाणी राजकोट, गुजरात भागातुन मिळाल्याचे समजले. ही नाणी अत्यंत हुशारीने बनवली जात आहेत पण आपण सावध राहिलात तर नक्कीच आपण ती ओळखु शकाल. आपल्याला सावध करण्याच्या हेतुने ही पोस्ट लिहीलेली आहे.
या खोट्या नाण्यांची छायाचित्रे सोबत जोडत आहे, ती आपण निरखुन पहावी आणि सावध व्हावे.
हि पोस्ट पुढे share करा जेणे करून आपल्या मित्रांनाही याबद्दल माहिती होईल.

- आशुतोष सुनिल पाटिल.
No automatic alt text available. Image may contain: food

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...