Skip to main content

Posts

शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून..

८ फेब्रुवारी १६६५ _______________________________________ इ.स १६६५ मार्च १४. कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट. "फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले." -शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४ _________________________________________ "शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले." -जेधे शकावली _________________________________________ "बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना केलें.बसनूरची मत्ता अगणिंत माल जडजवाहिर कापड जिन्नस घेऊन आपले देशास आले. -सभासद बखर ___________________________...

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा

राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली. बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला (मे १६७५). या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १६७५ मध्ये पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. पठाणांचे बंड मोडावे आणि मराठ्यांना प्रतिकार करावा ...

राज्याभिषेक | Shivrajyabhishek

मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला. रा ज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रांवरून उपलब्ध झाले आहेत. २९ मे १६७४ रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. ३० मे १६७४ रोजी पत्नींशी वैदिक पध्दतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील सहा दिवस विविध समारंभ होत होते. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याभिषे...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].

आदिलशहा, मराठे–इंग्रज

अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला (६ मार्च १६७३). सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च १६७३) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर याने खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव ठार झाला. मो गल सरदार दिलेरखान आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांनी युती करून मराठ्यांवर चाल केली; पण...

मोगल-मराठा संघर्ष

शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला (८ मार्च १६७०). मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसऱ्या हल्ल्यात (जून १६७०) मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला. माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला. तसेच महाराजांचे सैन्य दक्षिणच्या सुभ्यात चहूकडे पसरले. त्यांनी वऱ्हाड आणि पूर्व महाराष्ट्र येथील प्रदेशांवर आक्रमणे केली. खेड्यापाड्यातून मराठे चौथाई वसूल करू लागले...

मांजराबाद किल्ला....

कर्नाटक राज्य हसन जिल्हा.... हा किल्ला मटकाचा तत्कालीन एका राजाने १९७२ मध्ये बांधला होता... फ्रांसिसी वास्तुकार सेबास्टियन ले पॅस्ट्र्रे डे वाबॅन यांनी विकसित केलेल्या किल्ल्याच्या पत्राच्या आधारावर हे भारतातील कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यात आहे... १७९२ मध्ये जेव्हा त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात मैसूर आपली सार्वभौमत्वाची स्थापना केली तेव्हा यावेळी मराठ्यांनी आणि हैदराबादचा निजाम ब्रिटिशांच्या बरोबरीने आला होता सुलतान आपल्या विस्तार कार्यक्रमांसाठी मंगलोर आणि कूर्ग यांच्यातील महामार्ग तयार करू इच्छित होते ब्रिटिशांच्या विरोधात लढताना त्याला फ्रेंच समूहाशी संबोधण्यात आले म्हणून त्यांनी देशाच्या कोणत्याही इतर बांधकामाऐवजी एक अद्वितीय किल्ला बांधण्यासाठी फ्रेंच अभियंतेच्या मदतीची मागणी केली.... फ्रेंच सैन्याच्या लुई चौदावाच्या कारकिर्दीत फ्रान्सच्या सुप्रसिद्ध लष्करी अभियंता आणि किल्ल्याचे आयुक्त सेबास्टियन ले प्रेस्ट्रे डे व्हुबन (१६३३-१७०७) यांनी विकसित केलेल्या लष्करी वास्तूची रचना त्याने स्वीकारली..... ताऱ्याच्या आकारा सारखा किल्ला आहे....... माहिती सा...