Skip to main content

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा

राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली.


बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला (मे १६७५). या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १६७५ मध्ये पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. पठाणांचे बंड मोडावे आणि मराठ्यांना प्रतिकार करावा असे ठरले; पण पठाण खवळले आणि खवासखान हा विजापूरला येताच त्यांनी त्याला कैदेत टाकले (११ नोव्हेंबर १६७५). तेव्हा दक्षिणी मुसलमान सरदार शेख मिन्हाज याने बहलोलखानाचा पठाण सरदार खिज्रखानाला ठार मारले. त्याचा सूड म्हणून पठाणांनी खवासखान यास ठार मारले (१८ जानेवारी १६७६). परिणामतः दक्षिणी मुसलमान आणि पठाण यांच्यात शाह डोंगर मुक्कामी प्रखर युद्ध होऊन दक्षिणी पक्षाचा मोड झाला (२१ मार्च १६७६).
शेख मिन्हाज आणि दक्षिणी सरदार यांनी गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाची मदत मागितली. विजापूरची सूत्रे बहलोलखानाकडे आली. औरंगजेब पंजाबातून २७ मार्च १६७६ रोजी दिल्लीला परत आला. त्याने विजापूरच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बहादुरखानास विजापूरवर स्वारी करण्याची आज्ञा दिली आणि दिलेरखानास दक्षिणेत रवाना केले (जून १६७६). दिलेरखानाबरोबर नेताजी पालकरलाही दक्षिणेत पाठविले. नेताजीला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता. दक्षिणेत येताच त्याने संधी साधून दिलेरखानाची छावणी सोडली आणि तो महाराजांकडे आला. त्याचे शुध्दीकरण करून महाराजांनी त्याला हिंदू केले (१९ जून १६७६).


जानेवारी-फेब्रुवारी १६७६ दरम्यान शिवाजी महाराज सातारला आजारी होते, तत्संबंधी अनेक अफवा प्रसृत झाल्या. संभाजी आणि सावत्र आई सोयराबाई यांचे परस्परसंबंध चिघळत असल्याची वदंता होती. संभाजींच्या वर्तनाविषयीच्या बातम्यांत काही अंशी वदंताही असावी; पण शिवाजी महाराजांनी शांतपणे या सर्व बाबी हाताळल्या. विजापूरविरुध्द मोगलांनी चालविलेली तयारी ते बारकाईने पहात होते. विजापूर राज्यातील अथणी, संपगाव इ. भागांतही ते स्वतः आक्रमणे करीत होते. मोगल सुभेदार बहादुरखान याने भीमा ओलांडून विजापूरवर चाल केली (३१ मे १६७६). विजापूरजवळील इंडी येथील युद्धात मोगलांची दैना उडाली (१३ जून १६७६). त्यात मोगल सरदार इस्लामखान रुमी मुलांसह ठार झाला. मोठ्या कष्टाने मोगलांनी माघार घेतली आणि नळदुर्ग किल्ल्याला वेढा घातला. बहलोलखानाने तो उठविला त्यात बहादुरखानाचाच मुलगा मोहसीन मारला गेला (ऑगस्ट १६७६). तेव्हा त्याने विजापूरचे दक्षिणी सरदार शेख मिन्हाज, सिद्दी मसूद, शेख जुनैदी यांना पुन्हा एकत्र आणले आणि विजापूरच्या पाडावासाठी महाराजांच्या मदतीची अपेक्षा धरली. महाराजांनी या संधीचा पूर्ण लाभ उठविला. त्यामुळे मराठ्यांना दक्षिण भारतात मोठे आश्रयस्थान निर्माण झाले.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...