Skip to main content

शिवचरित्रमाला भाग ७

तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ!
विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या
पहिल्याच रणधुमाळीत
शिवाजीराजांनी
अस्मानी यश मिळविलं। पण राजे
वडिलांच्यावर रागावले , चिडले अन् संतापलेसुद्धा। का ?
कारण शहाजीराजे बेसावध राहिले , पकडले
गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले.
जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक
यातना असह्य झाल्या. हे सारं
शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं.
खरंच होतं ते। याची खंत
शहाजीराजांना स्वत:लाही
निश्चितच होती. पण पेच
सोडविण्यासाठी
शहाजीराजांनी
शिवाजीराजांच्या हाती असलेला
स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि
कर्नाटकातील शहाजीराजांचं
महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन
टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून
शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य
ठरणारी गाफिलपणाची चूक
स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे
यांनी केली. परिणाम मात्र या
लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ
आली. तळहातावरती भाग्याचा
तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला
फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख राजांना होत होतं.
स्वराज्यातील तळहाताएवढी
भूमीही शत्रूला देताना यातना
होण्याची गरज असते!
कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन
टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर
आली। आणि महाराज व्यथीत
झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच
अस्वस्थ होऊन बसले.
मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता। एकटे
शिवाजीराजे खिन्न होते , कोंढाण्यावर. राजे
कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत
ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ
डबीर यांच्या लक्षात आली.
सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे
मुत्सद्दी. भोसले घराण्यावर
त्यांची अपार माया. ते चरण
चालीने शिवाजीराजांकडे गेले.
महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनो
विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात
त्यांना पुसलं. ‘ महाराज , आपण चिंतावंत का ? आता
काळजी कशाची ?
तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज
शाही कैदेतून मुक्त झाले. आपले
राज्यही आपण वाचविले. मग चिंता
कशाची ?
‘ राजांनी गंभीर शब्दात म्हटलं
, ‘ काय सांगावं! आमचे तीर्थरुपसाहेब
बेसावध राहिले आणि शाही
जाळीत अडकले। आम्ही
हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग
पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या
मागणीवरून आपला
स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन
टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या
गोष्टीला ? आमच्या कामाचे मोल वडिलांस
समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते
म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले.
‘ हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत
होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच
गंभीर होऊन जरा कठोर
वडिलकीचे शब्दात म्हणाले , ‘ महाराज ,
काय बोलता हे ? वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं
आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही.
‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर
होऊन ऐकू लागले। ‘ महाराज वडील चुकले
तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल
असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड
विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता
हे सोसावेच महाराज! वडिलांचा मान राखावा.
‘ शिवाजीराजे एकदम स्वत:स
सावरीत बआदब म्हणाले , ‘
नाही , आमचं चुकलं। वडिलांचा अपमान
करावा म्हणून आम्ही बोललो
नाही. स्वराज्याचे नुकसान , मनाला मानवले
नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून
बोललो.
‘ ‘ महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे ? हा
अतिमोलाचा गड देऊन टाकावा। महाराज , आपण तर
अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच
नका. ‘ महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला. पटला.
त्यांनी जरा तीव्र शब्दांत
म्हटलं. ‘ होय ‘ जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान
ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं
आम्हाला सहन होत नाही.
ज्यांनी ज्यांनी आमच्या
तीर्थरुपांचा असा हीन अपमान
केला , त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या
हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे
, ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई
मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही
घेऊ.
‘ सोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले।
अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि
वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं
पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या
मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श
ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण
नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला
लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत
अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला.
हा सारा संवाद पुढे कवींद परमानंद गोविंद
नेवासकर यांनी लिहून ठेवला। त्याचा हा
आशय.
कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी
देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्या
आज्ञेवरून!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Image may contain: one or more people and people sitting

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...