Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १३

आलं उधाण दर्याला.
मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी
अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब
संतापलेलाच होता। पण आत्ता यावेळी
काहीच करता येत नाही. हे लक्षात घेऊन
तो दिल्लीला गेला. पण त्याच्या मनात
शिवाजीराजांचा पुरेपूर काटा
काढायचा हे नक्कीच झालं. विस्मय
वाटतो , तो राजांच्या कमालीच्या
धाडसाचा. एका कर्दनकाळ सत्तेच्या
विरुद्ध आपणहून बेमुर्वत हे असलं लष्करी
राजकारण करायचं राजांनी साहस केलं
ही अत्यंत मोठी झेप होती. पण ती
अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक
होती. तो वेडेपणा नव्हता. तो मिळत
असलेल्या संधीचा अचूक अन् हमखास
फायदा घेणं होतं. तो फायदा राजांना
झालाच.
अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात
पेशव्यांना लाभल्या। पण त्याचा फायदा
क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला.
तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी
आमच्याविरुद्ध अचूक टिपला. लहान वयात
आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी
राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं
जिंकले. ज्याला नेतृत्त्व करायचं आहे ,
त्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास
करावा. काळजांत अचूक कल्पनेची कळ
येईल. बुद्धीत बळ येईल अन् पदरात फळ पडेल.
आता आपण शिवाजीराजांचा नुसताच
जयजयकार जरा कमीच करावा!
दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी
शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण
कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी
स्वारी मांडली। महिनोन्महिने राजा
स्वारीवर आहे , त्याला विश्रांती सोसतच
नाही. या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण
महाराजांच्या कब्जात आलं असं नाही.
पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि
काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं
शेपटाचा फटकारा मारून एकेक भलामोठा
मासा मारावा , तसा एकेक जलदुर्ग
राजांनी मटकावला. हरणेचा किल्ला ,
जयगड , घेरिया , देवगड , रेडी अन् थेट
तेरेखोल शिवाय सह्यादीच्या
अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरीदुर्ग
महाराजांनी काबीज केले. केवढं प्रचंड
वादळ आहे हे! आमच्या तरुण मनात असंच
काही अचाट कर्तृत्त्व , आजच्या हिंदवी
स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतंच
नाही का ? का येत नाही ? आळस ?
अज्ञान ? बेशिस्त ? अभिमानशून्यता ?
आत्मविश्वासाचा अभाव ?
अल्पसंतुष्टता ? सगळंच काही!
याच काळात इंग्लिश टोपीवाले
व्यापारी , बंदुकवाले लष्करी पोर्तुगीज
अन् सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो
मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत
होते। उंदराच्या कानाएवढे आणि
विड्याच्या पानाएवढे यांचे देश.
नकाशावर लौकर सापडतही नाहीत. पण
त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार
होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला
येत होती.
कोकणातील या स्वारीत ( इ। स. १६५७ ते
५८ ) शिवाजीराजांच्या नजरेस अनेक
गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर
काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात
राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं
गवसली , ती फारच मोलाची होती.
मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर ,
दौलतखान , सिदी मिस्त्री ,
इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी
कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी
भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत
मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात
कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती
हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ
लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी
होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा
पराक्रमाची हौस आणि उत्तुंग
महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात
उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर
काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या
योजना आखल्या. कृतीतही आणल्या.
या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय
सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना
आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग
जमिनीवर रांगता येत होतं.
एकच पुढच्या काळातील इतिहासातील
साक्ष सांगू का ? शिवाजीराजांच्या
मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून
टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं
स्वारी केली। पंचवीस वर्ष तो मराठी
देशावर थैमान घालत होता. पण कोकणात
किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला
अन् कोकणची वीतभर जमिनही
औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली
नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी
अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी
अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य
आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व
कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं.
आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ‘
रामागाडी ‘ म्हणून भंाडी घासायला
लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत
घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या
विसळायला लावतोय. वास्तविक यांचा
मान भारताच्या आरमारी नौकांवरून
शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा
आहे. ही सारी मार्शल रेस आहे.
शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे
ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या
लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम
पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा ,
मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी
दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...