Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १४

*मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला*
याच कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ )
शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद आणि भूमी
कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही
लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांचा
कब्जा राजांनी घेतला होता. राजमाची
, लोहगड , तुंगतिकोना आणि पूवीर्
शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्या
ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा
राजांनी काबीज केला होता.
कोकणातील पण सह्यादीवर असलेले
माहुली , कोहजगड , सिद्धगड , मलंगगड ,
सरसगड , इत्यादी गडही जिंकले होते.
स्वराज्य वाढलं होतं.
विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह
मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६
रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा
मुलगा अली आता बादशाह झाला होता।
हा अली वयाने १७ – १८ वर्षांचाच होता.
त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ
बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत
होती.
क्वचितच एखाद्या झटापटीत
स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत
होता। नाही असं नाही. पण उल्लेख
करावा असा एकही विजय या काळात
आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला
नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत
होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून
गेलेल्या विजापूरच्या शाही दरबारची
अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं
म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना
साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर
एकदम उठली होती. हीच शिवक्रांती
सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि
बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय
तोटा ? त्यांचं पोट सततच दुखत होतं.
राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे
(इ. स. १६५७ – ५८ ) आदिलशाही गलबलून
गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं
हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत
नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड
नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या
येत होत्या.
या मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं ?
का जय मिळत होते ? असं कोणचं ‘
मिसाईल ‘ महाराजांना गवसलं होतं ?
आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला
पाहिजे. महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत:
उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते
आपल्या मावळ्यांना म्हणताहेत.
‘ आपापले काम चोख करा ‘, ‘ हे राज्य
श्रीच्या आशीर्वादाचे आहे ‘, ‘ पराक्रमाचे
तमाशे दाखवा ‘, ‘ या राज्याचे रक्षण करणे
हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे , त्यांस चुकू
नका। ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी
नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला.
तो मुक्त करावा , ऐसा मानस आहे.
आणि असेच कितीतरी वमीर् भिडवित असे
शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या
पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले। हे
शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी
स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले.
अनुशासन , शिस्त , निस्वार्थ सेवा , स्वच्छ
राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत
विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म
होते. म्हणूनच हरघडी , हरदिवशी ,
नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता.
मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज
झुकत होतं , ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत
होतं स्वराज्य आणि बहरत होते
स्वाभिमानी संसार. आळस , अज्ञान , अन्
अहंकार यांची हकालपट्टी झाली होती.
अन् लाचारी , फितुरी आणि हरामखोरी
यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं
घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं. फुलत असतं.
शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर
होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण
रोज आणि अखंड उठत होते। पण पोरं हसत
हसत कण्हत होती. अभिमानानं कण्हत
होती , अन् मग कोणी एखादा शाहीर
डफावर थाप मारून गर्जत होता. ‘
मराठियांची पोरं आम्ही , भिणार नाही
मरणाला
‘ अन् मग माझ्यासारख्या सह्यादीच्या
दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या
गोंधळ्याला सुचू लागतं की ,
मऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार
मरणाला!
सांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या
विश्वाला.
तीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी
भवानिचा.
पोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख
आहे जबानिचा!

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...