Skip to main content

Posts

Showing posts from November, 2017

History Of Chhatrapati Shivaji Maharaj Ganimi Kava In Marathi Best Toddler Learning Videos

Weapons of Maratha

real video jagdamba talwar of shivaji maharaj at britsh musume London

shivaji maharaj real photo

Shivaji Maharaj Original Photo In London | छ.शिवाजी महाराज Original Photo Collection | Mohan Mane |

History Of Chhatrapati Shivaji Maharaj Ganimi Kava In Marathi Best Toddler Learning Videos

Chhatrapati Shivaji Maharaj - The greatest warriors in history भारत इतिहास का महान योद्धा

Baji prabu deshpande

Shivaji maharaj kill the afjal khan

जीवा महाला !! Jiva Mahala

श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी एक असे हे जीवा महाला !! या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय. “छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व चौथरीयाखाले उडी घालोन निघोन गेले.. इतक्यात स ैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले. पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला. तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.” याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे “होता जीवा म्हणून वाचला शिवा” अशी उक्ती प्रचलित झाली. अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली…. अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा.. धन्य ते शिवराय आणि धन्य ते शिवरायांचे मावळे.. —

कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे

कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे यांचा शिवाजीराजा नाहीए संभाजी ला आम्ही मारले आहे राजाराम पण आता जिवंत नाही संभाजीची बायको व मुलगा आमच्या ताब्यात आहे पाच वर्षाच्या पोराला राजा करुन राजारामाची बायको ताराराणी काही हजार सैन्यानीशी आमच्या लाखाच्या वर सैन्यांशी दोन हात करतेय इराण पासुन ते उत्तर दक्षिण हिंदुस्तान आमच्या बादशाह ला घाबरतो पण हे मराठे........ आमच्या सैनिकांना स्वप्नात व घोड्यांना पण पाण्यात दिसतात ह्यांची सहाशे - सातशे ची शिबंदी पुर्ण किल्ला आमच्या विस हजार सैन्या पुढे लढवते, वर आम्ही यांना जर खलीता पाठवला की गड ख़ाली करा नाहीतर जेव्हा जिंकेल तेव्हा तुमची पोर मारु बायको नासवु पण ह्यांच पोर पण घाबरत नाय आणी बायका तो खलीता घालतात चुलीत तेव्हा वाटत काय चीज आहे हे मराठे मरायला ही तयार आणी मारायला लागले की पिवळा भंडारा लवलेले हे लोक आमच्या रक्ताने लाल होतात शिवाजीची स्वामिनीष्ठा आणी संभाजी ची जीव गेला तरी शरण जायच नाय हि शिकवण, अशी मस्ती असलेले हे मराठे..... आज आमचे बादशहा गेले त्यांनी अनेक राजे संपवले पण त्यांना आज काफीर मराठ्यांनी संपवले या ख़ुदा क्या लोग ह...

राजियांनी अफझल मारिला, कर्म केले, यश आले. Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan

Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan इ .स.१६४९-१६५६ ही सात वर्षे,या सात वर्षात एकिकडे शिवराय प्रजेची चोख व्यवस्था लावीत होते व दुसरीकडे आपले युद्धसामर्थ्य क्रमाने वाढवत होते. त्यानंतर उठाव करण्याचा प्रयत्न म्हणजे अफजलखानाच्या स्वारीला आमंत्रण,याची छत्रपतींना पुर्ण कल्पना होती. कारण अफजलखान हा वाईचा सुभेदार होता.त्याच्या सुभ्यावर हल्ला झाल्याने त्याची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडणार होती. स्वत: अफजलखान हा कर्नाटकाच्या लढाईत गुंतलेला होता. त्यामुळे तो वेगाने जावळीकडे लक्ष देऊ शकत नव्हता. त्यांना शिवरायांकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. यानंतर उसंत सापडल्याबरोबर प्रचंड शक्तिनिशी अफजलखान हल्ला करणार,हि गोष्ट ठरल्यासारखी होती. भारतीय राजांमध्ये शिवराय हे असे विरळ राजे आहेत की, ज्यांनी सदैव संभाव्य परिणामांचा विचार केला.युद्धाची योजना आखताना भूगोलाचा विचार केला.त्यामुळे आदिलशाही मोगलांच्या स्वारीत व्यस्त असताना छत्रपतींनी खानाच्या आगमनाची तयारी जोरात केली,शिवरायांनी जावळीच्या खोर्यात आपली व्यवस्था रुजवली . शत्रुपक्षाकडील प्रत्येक गुप्त बातमी आपल्याला मिळेल याची काळ...

फ्रान्सचा_यशवंतराव yashvantrao of frans

#काही इतिहासकारांनी यशवंतराव होळकरांना भारताचा नेपोलियन अशी पदवी दिली आहे. कारण इतिहासकारांच्या मते दोघांच्या युद्ध रणनीतीमध्ये असलेले साम्य. पण वास्तव याहून वेगळे आहे. खरे तर यशवंतरावांनी नेपोलियनच्या आधी लढाया केल्या. त्यांच्यानंतर नेपोलियनने. यशवंतराव आणि इंग्रज यांच्यात झालेली युद्धे, त्यामध्ये यशवंतरावांची सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची वृत्ती, संभाव्य पराजयाचाही केलेला विजय, बेमालूमपणे इंग्रजांची केलेली कत्तल, गोऱ्यांना पळता भूई थोडी करून त्यांची कापलेली नाके, भरतपूरच्या युद्धात केलेला इंग्रजांचा दारुण पराभव इत्यादी राजकीय व सामरिक घटनांची नोंद भारतातील तत्कालीन फ्रेंच आपल्या मायदेशी कळवत होते. इंग्रज यशवंतरावांना पूर्णपणे कधीही पराभूत करु शकले नाहीत. याची जागतिक इतिहासकारांनी नोंद केलेली आहे. यावरून नेपोलियन या घटनांमधून काहीच शीकला नाही असे म्हणता येणार नाही. या उलट इंग्रजांनी नेपोलियनचा कितीतरी वेळा पराभव केला आहे. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची इंग्रज सरकारला हकालपट्टी करावी लागली होती. याची इतिहासात नोंद आहे. फ्रेंच इतिह...

#बाळोजी नाईक ढमाले देशमुख :- baloji naik

नोव्हेंबर १६९५ ला औरंगजेबाचा मुक्काम विजापुर जिल्ह्यातील गलगली इथे होता. त्याने जुन्नरचा किल्लेदार आणि फौजदार मन्सूरखान याला कुवारीगड जिंकून घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार मन्सूरखानाने आपला मुलगा मुहम्मद काजिम याच्या हाताखाली सैन्य देऊन पौड मावळाकडे रवाना केलं. काजिकच्या लोकांनी किल्ल्यातल्या रायाजी बाहुलकर नावाच्या माणसाला अमिषं दाखवून आपल्या बाजूला वळवून घेतलं. मोगल शिड्या लावून आत शिरले, भयंकर रणकंदन सुरू झाले. मोगलांच्या सैन्यबळामुळे आणि राया जीच्या फितुरीमुळे कुवारीगड मोगलांच्या ताब्यात गेला. त्र्यंबक शिवदेव आणि मोरो नारायण हे अधिकारी कैद झाले , तर गिजोर्जी निंबाळकर, दिनकरराव आणि त्यांचे निष्ठावंत मराठे स्वामीकार्यावर खर्ची पडले. कुवारीगडाच्या पराभवाची बातमी शंकराजी नारायण सचिवांच्या कानावर येऊन पोहोचली. त्यावेळी ते राजगडावर होते. मोगलांनी किल्ला भेद करून घेतल्याच्या बातमीने ते दु:खी झाले. पण खचले नाहीत. त्यांनी कुवारीगड परत जिंकून घेण्याचा निश्चय केला. गडावर मोघली सैन्य वेढा घालून बसले होते. मोघली सरदार मुहम्मद काजिमचा बाप मन्सूरखान हा जुन्नरचा फौजदार कुव...

मुसलमानी_रियासत Muslim Riyasat

रझिया सुलतान (१२३६- १२४०) दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन इल्टमश याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा रुकनुद्दीन फिरोजशहा १२३६ मध्ये गादीवर आला.तो अत्यंत दुरवर्तनी, विलासी होता.त्याच्या ऐवजी त्याची दृष्ट आई राज्यकारभार करत होती.त्यामुळे वैतागलेल्या दरबारातील लोकांनी त्या मायलेकांना कैदेत टाकून लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने इलत्मशची मुलगी रझिया हिच्या हाती राज्यकारभार दिला.पुढे त्या मायलेकांचा कैदेत असतानाच मृत्यू झाला. दिल्लीच्या तख्तावर बसलेली रझिया एकमेव स्त्री सुलतान होती.राझियाचा जन्म १२०५ साली झाला.तिच्याकडे राज्यकारभार कौशल्य,हुशारी,नेतृत्व, आणि मुसद्दीपणा हे गुण होते.ती मर्दानी पोशाख करून हत्तीवर स्वार होऊन प्रत्यक्ष युद्धात सैन्याचे नेतृत्व करी.तिला कारभार हाती घेतल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बदाऊन,सुलतान,हान्सी आणि लाहोरच्या सुभेदारांनी, तसेच वजीर निजाम-उल-मुल्कने राझियाला राजपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरु केले.तिने यावर लगेच कार्यवाही सुरु करून पण लष्करातील कमकुवतपणा लक्षात घेऊन युद्धप्रसंग टाळला.तिने मलिक सलारी व कबीरखान यांच्याशी गुप्तपणे संधान बांधले.त्यांना राझि...

Shivaji Maharaj confronts Aurangzeb

hivaji Maharaj Ani Tyanche Guru - 03 Sant Tukaram

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पोवाडा शाहीर पिलाजीराव सरनाईक