Skip to main content

फ्रान्सचा_यशवंतराव yashvantrao of frans


No automatic alt text available.
#काही इतिहासकारांनी यशवंतराव होळकरांना भारताचा नेपोलियन अशी पदवी दिली आहे. कारण इतिहासकारांच्या मते दोघांच्या युद्ध रणनीतीमध्ये असलेले साम्य. पण वास्तव याहून वेगळे आहे. खरे तर यशवंतरावांनी नेपोलियनच्या आधी लढाया केल्या. त्यांच्यानंतर नेपोलियनने. यशवंतराव आणि इंग्रज यांच्यात झालेली युद्धे, त्यामध्ये यशवंतरावांची सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची वृत्ती, संभाव्य पराजयाचाही केलेला विजय, बेमालूमपणे इंग्रजांची केलेली कत्तल, गोऱ्यांना पळता भूई थोडी करून त्यांची कापलेली नाके, भरतपूरच्या युद्धात केलेला इंग्रजांचा दारुण पराभव इत्यादी राजकीय व सामरिक घटनांची नोंद भारतातील तत्कालीन फ्रेंच आपल्या मायदेशी कळवत होते. इंग्रज यशवंतरावांना पूर्णपणे कधीही पराभूत करु शकले नाहीत. याची जागतिक इतिहासकारांनी नोंद केलेली आहे. यावरून नेपोलियन या घटनांमधून काहीच शीकला नाही असे म्हणता येणार नाही. या उलट इंग्रजांनी नेपोलियनचा कितीतरी वेळा पराभव केला आहे. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची इंग्रज सरकारला हकालपट्टी करावी लागली होती. याची इतिहासात नोंद आहे. फ्रेंच इतिहासकारांच्या मते १८०४ साली यशवंतराव आणि इंग्रज यांच्यात झालेले भरतपूरचे युद्ध हे नेपोलियन आणि इंग्रज यांच्यात १८१५ साली झालेल्या वार्टूल युद्धापेक्षा अवघड होते. भरतपूर युद्धात यशवंतरावांनी इंग्रजांची दाणादाण उडवली होती. तर वार्टूल येथील निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा इंग्रजांनी पूर्णपणे पाडाव करुन त्याला कैद केले होते. यावरून यशवंतरावांना भारताचा नेपोलियन न म्हणता उलट नेपोलियनला फ्रान्सचा यशवंतराव म्हणणे अधिक योग्य होईल. इतिहास अभ्यासावरून #धुळदेव कोळेकर #होळकरशाही

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...