Skip to main content

राजियांनी अफझल मारिला, कर्म केले, यश आले. Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan


Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan
.स.१६४९-१६५६ ही सात वर्षे,या सात वर्षात एकिकडे शिवराय प्रजेची चोख व्यवस्था लावीत होते व दुसरीकडे आपले युद्धसामर्थ्य क्रमाने वाढवत होते. त्यानंतर उठाव करण्याचा प्रयत्न म्हणजे अफजलखानाच्या स्वारीला आमंत्रण,याची छत्रपतींना पुर्ण कल्पना होती.
कारण अफजलखान हा वाईचा सुभेदार होता.त्याच्या सुभ्यावर हल्ला झाल्याने त्याची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडणार होती. स्वत: अफजलखान हा कर्नाटकाच्या लढाईत गुंतलेला होता. त्यामुळे तो वेगाने जावळीकडे लक्ष देऊ शकत नव्हता. त्यांना शिवरायांकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. यानंतर उसंत सापडल्याबरोबर प्रचंड शक्तिनिशी अफजलखान हल्ला करणार,हि गोष्ट ठरल्यासारखी होती.
भारतीय राजांमध्ये शिवराय हे असे विरळ राजे आहेत की, ज्यांनी सदैव संभाव्य परिणामांचा विचार केला.युद्धाची योजना आखताना भूगोलाचा विचार केला.त्यामुळे आदिलशाही मोगलांच्या स्वारीत व्यस्त असताना छत्रपतींनी खानाच्या आगमनाची तयारी जोरात केली,शिवरायांनी जावळीच्या खोर्यात आपली व्यवस्था रुजवली . शत्रुपक्षाकडील प्रत्येक गुप्त बातमी आपल्याला मिळेल याची काळजी घेतली.
शिवरायांचे गुप्तहेर खाते व युद्धाचे भौगोलिक नियोजन हा त्यांच्या युद्धनेतृत्वाचा महत्वाचा भाग आहे. अफजलखानाच्या स्वारीला त्याचाच सुभा जावळी हे उत्तर होते. आक्रमणाला अत्यंत प्रतिकुल रणभुमी हेत तर जावळीचे वैशिष्ट्य. जिथे नियोजन चालू होते, १२००० फौजांच्यासकट खान नष्ट करण्याचे , त्या नियोजनात खान जिवंत वाचु नये हे गृहीत होते. अफजलखान या प्रश्नाला शिवरायांनी जावळी हे उत्तर कल्पनेत रचले होते. ते त्यांनी व्यवहारात साकार केले. महिनोगणती तपशीलवार रचना करुन ठरविक ठिकाणी, ठराविक दिवशी शत्रुला आणण्याची व त्याच्या संपूर्ण नाशाची योजना आखायची, ती त्याला परत जाऊ देण्यासाठी नसते.
महाराजांनी ज्यावेळी जावळी घेतली त्याचवेळेस खान आपल्यावर चालुन येणार हे महाराजांनी माहित होते कारण खान हा वाईचा सुभेदार होता व ज्या सुभ्यात बंड होईल त्या बंडाची पारिपत्याची जबाबदारी त्या सुभेदारावर असते. खान हा कसलेला योद्धा होता.तो कुशल सेनानी होता,तसा कपटी होता आणि विशेष म्हणजे रणमैदान त्याच्या ओळखीचे होते कारण तो त्याच्याच सुभ्याचा भाग होता.त्यामुळे खान मुर्ख,गर्विष्ठ,बेसावध , प्रदेशाला अपरिचित सरदार होता हे म्हणणे चुकीचे राहिल.
"शिवरायांच्या चरित्रकाराला त्यांच्या शत्रुंची मग तो खान असो शाहिस्तेखान असो किंवा औरंगजेब असो ह्यांना पुर्णपणे मांडण्यास असमर्थ ठरल्यास शिवरायांचा पराक्रम निम्म्याहुन अधिक ढासळतो",
कारणे हे शत्रु काही साधे-सुधे नव्हते.अफजलखानाने मुघल सम्राट औरंगजेबाला वेढ्यात अडकवले होते ,महाराजसाहेब शहाजी महाराजांना कपटाने कैद करण्यात खानाचा पुढाकार होता एवढा तो पराक्रमी होता.एक कुशल यौद्धा ,राजा म्हणुन शिवरायांचे महत्व ह्यात आहे की त्यांनी अफजलखानाची स्वारी यशस्वी होऊ दिली नाही.या ठिकाणी शिवरायांचे चौरस नियोजन व विजयाला राज्यविस्तारात रुपांतर करण्याचे कौशल्य दिसुन येते.
अफजलखानाचा वधाचा उत्सव करत शिवराय बसले नाहीत त्यानी तातडीने पन्हाळा कोल्हापूर घेतला, घोडदळ ३००० वरुन ७००० वर गेले.
. अफजलखान वधाचा प्रसंग आला म्हणजे चर्चा सुरु होते आधी कुणी दगा दिला. हा पुर्णपणे निरर्थक चर्चा आहे.प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलेला खान जिवंत परत जाणे शक्य नव्हते,हे आपण समजुन घेतले पाहिजे.याचा खान कसा वागला ह्याच्याशी संबंध नसुन पुढच्या ध्येयवादाशी आणि मागच्या इतिहासाशी आहे.
ठरल्याप्रमाणे १० नोव्हेंबर १६५९ रोजी खान मारला गेला,जावळीच्या खोर्यातील त्याच्या प्रचंड फौजांचा पराभव झाला.इथुन एका वैभवशाली बदलास सुरुवात होते. हा अखिल भारतीय कर्तृत्वाचा पहिला बहर होता. त्याचे कडु-गोड परिणाम सर्वांनाच चाखणे भाग होते.खानवधानंतर आलेल्या शाहिस्तेखान व सिद्दीजौहर या तिप्पट आक्रमणामुळे शिवरायांना आता अखिल भारतीय स्तरावर महत्व वाढले आणि चटकन लक्षात येते..
-नरहर करुंदकर

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...