Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

७. शिवचरित्र विसरण्याच्या कृतघ्नपणाचे दुष्परिणाम ! इंग्रज जेव्हा या देशात आले, तेव्हा त्यांनी रायगड ताब्यात घेतला व महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट केले. तसेच सर्व संस्थाने खालसा करून टाकली. रायगडावर केलेल्या बाँबहल्ल्यामुळे रायगड १८ दिवस जळत होता. रायगडावरील शिवाजी महाराजांनी बांधलेले आठ महाल इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकले. रायगडावरील सिंहासनाचे काय केले, ते माहीत नाही. सर रिचर्ड टेंपल हे भारताचे गर्व्हनर होते. त्यांना एकदा विचारले, ‘‘औरंगजेब ७ लाख मुसलमानांची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. २५ वर्षे तो लढत होता; पण २५ वर्षांत त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य नष्ट करता आले नाही. औरंगजेबाला ७ लाख माणसांच्या साहाय्याने प्रचंड दारूगोळा असतांना जे २५ वर्षांत जमले नाही, ते तुम्ही १०-१५ वर्षांत कसे काय साध्य केले ? इतक्या कमी शस्त्रांनी कसे काय हे साध्य केले ?’’ त्या वेळी रिचर्ड टेंपल यांनी दिलेले उत्तर अगदी मौलिक आहे. त्यांनी सांगितले, ‘‘जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, तेव्हा अवघ्या महाराष्ट्रातील लोकांना शिव...

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

६. राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज ! छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी उभारलेला अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला भारताला सहस्रो मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील चोल राजांनी त्यांच्या शक्तीशाली नौदलाच्या साहाय्याने पूर्व आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांवर वर्चस्व निर्माण करून तेथे आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला होता. कंबोडियातील अंकोरवाट येथील जगातील सर्वांत भव्य हिंदु मंदिर आजही त्याची साक्ष देत उभे आहे; मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या समुद्रबंदीसारख्या अत्यंत घातक रूढीमुळे सागराशी नाते तोडलेल्या भारतियांनी समुद्रावरील वर्चस्व गमावले. त्याचाच परिणाम नंतरच्या काळात याच समुद्रावरून आलेल्या परकीय सागरी सत्तांनी या देशालाच गुलाम केले. उत्तरेकडील खैबरखिंड आणि बोलण खिंडीतून हिंदुस्थानशी होणारा व्यापार थांबल्यावर पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा याने आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या समुद्रकिर्नायावर येण्याचा नवा मार्ग शोधून...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

शिवभारतकार परमानंद शिवजन्माविषयी लिहितात....

शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य 3 शके 1551 ता. (19 फेब्रुवारी 1630) रोजी किल्ले शिवनेरीवर झाला. "त्यांचे खांदे उंच,नेत्र कमलासारखे,शरीर निकोप,वर्ण सुवर्णासारखा,नासिका ताज्या पळसाच्या फुलासारखी,मुख हसरे,स्वर मेघासारखा गंभीर,छाती विशाल व बाहु मोठे होते." त्यांच्या जन्मवेळी शहाजीराजे जिजाऊना शिवनेरीवर ठेवून खानदेशात दर्याखान पठाणाशी लढण्यासाठी गेले होते. अशा रितीने महाराजांच्या जन्मालाच लढाई लागली होती ती अखेरपर्यंत पुरुन उरली. # शिवराय_मनामनात_शिवजयंतीघराघरात छायाचित्र - अतुल विजय चव्हाण

४. व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

‘श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी ‘T. Y. B.C.A.’ या वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे (Principals of Management) हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. अ.  Forecasting’ (पूर्व अंदाज) शिकवतांना शिवरायांच्या स्वराज्याचे ‘कान-नाक-डोळे’ म्हणून ओळखले जाणारे ‘बहिर्जी नाईक’ यांचे उदाहरण दिले. आ. Planning (नियोजन) शिकवितांना हिंदवी स्वराज्याचे दूरदर्शी नियोजन करत महाराष्ट्रात ३५० गड बांधणार्‍या शिवरायांचे उदाहरण दिले. इ. Decision Making (निर्णय घेणे) हे तत्त्व शिकवितांना छ. शिवरायांनी अफजलखान वध, प्रसंगी मिर्झाराजे जयसिंग याच्याशी तह करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटण्याचा निर्णय यांची उदाहरणे दिली. ई. Leading (नेतृत्व) शिकवितांना सूत्र अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढील वाक्य वापरले –  ‘‘Chhatrapati Shivaji Maharaj was a great Leader in the Indian History; पण औरंगजेबाला तसा नेता होता आले नाही. नेत्याचे सर्व गुण छ. शिवाजी महाराजांमध्ये होते; पण आपल्या महाराष्ट्र...

३. शिवरायांची युद्धनीती

१ अ. महान सेनानी ! – औरंगजेब ‘प्रत्यक्ष औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ‘‘ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांचे बळ मात्र वाढतच होते.’’ १ आ. हुशार आणि लष्करी डावपेचात निष्णात ! – गोव्याचा गव्हर्नर गोव्याचा गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल अंतोनियो पाइश द सांद याने शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील युद्धाचा एक अहवाल पोर्तुगालच्या सागरोत्तर मंडळाला पाठवला आहे. त्यात तो म्हणतो, शिवाजीराजे यांनी गोव्यापासून दमणपर्यंतच्या आमच्या सीमेला (सरहद्दीला) लागून असलेला प्रदेश घेतला असून सांप्रत ते मुघलांशी युद्धात गुंतलेले आहेत. हा हिंदुस्थानचा नवा ‘ अॅटिला ’ इतका हुशार आणि लष्करी डावपेचात इतका निष्णात आहे की, तो बचावाचे आणि चढाईचे युद्धही तितक्याच कुशलतेने खेळतो. तो मुघल प्रदेशात घोडदळ पाठवून प्रदेश जाळून बेचिराख करत आहे. १ इ. शिवाजी महारा...

२. महाराजांनी देवांचे आणि देवालयांचे रक्षण केले !

‘छत्रपती शिवाजी राजांनी पवित्र वेदांचे रक्षण केले. पुराणांचे रक्षण केले. सुंदर जिभेवर घेतले जाणारे रामनाम वाचविले. हिंदूंच्या शेंडीचे रक्षण केले. शिपायांची भाकरी वाचवली. हिंदूंच्या जानव्याचे रक्षण केले आणि त्यांच्या गळ्यात असलेली माळ वाचवली. मोगलांना चुरगाळून टाकले, पातशहांना मोडून टाकले आणि शत्रूंना भरडून काढले. त्यांच्या हातात वरदान होते. शिवरायांनी आपल्या तलवारीच्या बळावर राजमर्यादेचे रक्षण केले. त्यांनी देवांचे आणि देवालयांचे रक्षण केले. स्वदेशात स्वधर्माचे रक्षण केले. उन्मत्त रावणास जसे प्रभू रामचंद्र, क्रूर कंसास जसे भगवान श्रीकृष्ण, तसे म्लेंच्छ कुळास छत्रपती शिवराय आहेत.’ – कवी भूषण

पावन खिंड

१. इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ’खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हाताशी धरून त्यांचे पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. ...

देशप्रेमी शिवराय : मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारास लिहिलेले पत्र

  इसिसने वर्ष २०२० पर्यंत भारतापासून युरोपपर्यंतचा भाग इस्लाममय करायचा मनोदय घोषित केला आहे. काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ? नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा…       शिवरायांचा आठवावा साक्षेप       माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य !       छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अधिकार्‍यांना पाठविलेले एक फार्सी पत्र दोन जुन्या पत्रसंग्रहांमध्ये समाविष्ट आहे. त्यावर तारीख नसली, तरी ते शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर लिहिले आहे, हे त्यातील उल्लेखांवरून स्पष्ट समजते. पत्राचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.    ...

Panhala Fort