Skip to main content

प्लासीचे युद्ध आणि पुण्याचा त्रिशुंड गणपती !

आज आषाढ शुद्ध षष्ठी,
२६१ वर्षापुर्वी आजच प्रसिद्ध प्लासीचे युद्ध झाले आणि इंग्रजी सत्तेचा पाया भारतात मजबूत झाला.
पुण्यातील सोमवार पेठेत असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर आणि बंगालमध्ये खेळलेली प्लासी (पलाशी) ची लढाई यात संबंध कसा, यासाठी हा लेखप्रपंच.
पुण्यात गोसावी लोकांची वस्ती नागेश्वर मंदिराजवळ होती. त्याला गोसावीपुरा म्हणत. हा व्यापारी व सावकारी करणारा समाज होता. त्यांच्या प्रथेप्रमाणे मृत व्यक्तीची समाधी किंवा शिवमंदिर बांधली जातात जी आजही सोमवार पेठेत बघायला मिळतात. असच एक शिवमंदिर (सद्या गणेश मंदिर) 'भीमगिरजी' या संपन्न गोसावी ने बांधले, त्यांची समाधी तळघरात आहे. या मंदिराची उभारणी १७५४ ला सुरु होउन १७७० ला पुर्ण झाली. संपुर्ण मंदिर एकसंघ दगडातुन तयार केलाय. गाभार्यात मयुरावर तीन सोंड असलेली सुंदर गणेश मुर्ती विराजमान आहे तर गाभार्यावरती संस्कृत-मराठी-फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. एखाद्या लेण्याप्रमाणे वाटणारे हे मंदिर तसं उपेक्षीतच आहे. मंदिराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे प्रवेशदाराच्या भोवतीच सुरेख कोरीव काम आणि त्याचा पलाशीच्या युद्धाशी असणारा संबंध.
फक्त व्यापारासाठी भारतात आलेले इंग्रज राजकारणात डोकं खुपसायला लागले तेव्हा संस्थानांचा ताप वाढला. भाउबंदकी आणि मंत्र्याची कारस्थान याचा फायदा गोर्यांनी बर्याच वेळा घेतला. त्याची नांदी पलाशी च्या युद्धाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीने 'Lord Clive' च्या नेतृत्वाखाली बंगालच्या नवाब 'सिरज-उद-दौला' चा पराभव करण्यासाठी पाठवल. 'Lord Clive' ने नवाबाचा सेनापती 'मिर जाफर' याला पैसे देउन आपल्याबाजुने वळवले, नवाब बनवण्याचे आश्वासनही दिले. याचा होयचा तो परिणाम झाला. मिर जाफरने सैन्यासह युद्धभुमीवर Clive ची बाजु घेतली आणि सिरज-उद-दौला चा पराभव झाला. इंग्रजांच्या राज्याची अधिकृतपणे सुरुवात झाली. (म्हणुन शंभर वर्ष सहन केल्यावर शताब्दी वर्षी क्रांतिकारकांनी बंड पुकारला '१८५७')
सगळी कट-कारस्थान बरीच आधी पासुन चालु होती. सिरज-उद-दौला चा बाप अल्वरदी खान याने इंग्रजांशी कडक व्यवहार ठेवला होता. मराठ्यांनी १७४७ ला रघोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली बंगालवर यशस्वी हल्ला चढवला आणि तिथला प्रदेश जिंकला. सेनापती 'मिर जाफर' याने त्यातुन माघार घेतल्याचं ऐकल्यावर त्याला हाकलुन दिल, ज्याने पुढे घात केला. फ्रेंच आणि इंग्रजांशी नवाब अल्वरदी निकारेने लढला पण अखेर ८० व्या वर्षी त्याच निधन झाल आणि सगळी सुत्र नातू 'सिरज-उद-दौला' कडे आली, जी वर्षभरच टिकली. या सगळ्या बातम्या भारतभर पोहोचतच होत्या. मग त्या पेशव्यांपासुन थोडीच लपतील. व्यापारी गोसावींना याची माहिती होती. आसाम-बंगाल प्रांतातील भिषण स्थिती लक्षात घेउन त्यांनी ती चित्तरण्याचा प्रयत्न त्रिशुंड मंदिर बांधताना केला.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक शिल्प आहेत, त्यात द्वारपाल, यक्ष, माकडे, पोपट, गजलक्ष्मी, घंटा व सर्वात वर शेषशायी विष्णु कोरले आहेत. पण लक्ष वेधुन घेत ते इथलं देवकोष्ठके आणि त्याखाली असलेले २ शिल्पसमुहाच्या पट्टी. यात वरच्या शिल्पपट्टीत आसाम-बंगालचे सांकेतिक रूप तिथल्या प्रसिद्ध गेंड्याच्या शिल्पाद्वारे दाखवले आहे. शेजारी ३ इंग्लिश शिपाई त्यांच्या आगळ्या वेशभूषेत हातात बंदूक घेऊन त्या गेंड्याला पकडण्यात यशस्वी झाले आहेत. खालच्या पट्टीत झुंजणारे किंवा एकमेकांना भिडलेले २ हत्ती कोरलेले आहेत. हे हत्ती महाराष्ट्रातील सत्तांचे प्रतिक ठरतात.
ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी आता राजकीय सत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि या गोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही व मराठी सत्ताधीश आपापसात भांडत बसले तर आपल्या नशीबीही गुलामगिरी येइल असा इशारा देणारी ही शिल्पांकन आहेत. असे भविष्यवाणी व्यक्त करणारे चित्रण क्वचितच एखाद्या मंदिरावर केलेल दिसत.
ह्या ऐतिहासिक कलाकृतीला बघायला वाट वाकडी करून नक्कीच जायला हवं !
लेखनसीमा
- साकेत देव (भाटे)
आषाढ शुद्ध षष्ठी, शके १९४०
शिवराज्याभिषेक शके ३४५
(बुधवार, १८ जुलै २०१८)
फोटो - त्रिशूंड्या गणपती मंदिर व त्यावरील शिल्पांकन, सोमवार पेठ
संदर्भ -
(१) मुठेकाठचे पुणे - प्रा. प्र. के. घाणेकर
(२) हरवलेले पुणे - डाॅ. अविनाश सोवनी
(३) पुणे शहरातील मंदिरे - डाॅ. शां. ग. महाजन
(४) The Temples of Maharashtra - Gopal Krishna Kanhere
Image may contain: 4 people, people smiling

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...