Skip to main content

औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.

२५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला.
५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले.
दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत.
औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो..
दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले , " अशी परिस्थिती आली असती तर तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजाच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते.."
हे ऊत्तर औरंगजेबास कळविण्यात आले . असल्या अवज्ञेबद्दल व फाजील मोकळीक घेतल्याबद्दल तो अतिशय संतापला , त्याने आपल्या सर्वात वडील भावास देहांताची शिक्षा फर्मावली . हे कृत्य कोण करू शकेल असे विचारल्यावर हे भयंकर आणि अतिशय धोक्याचे काम करण्याची तयारी " नसर ( नझरबेग चेल्हा) बेग " याने दाखविली.
तो शहाजहानाचा गुलाम असून त्याच्या पदरीच तो वाढला होता. आपल्या बरोबर त्याने सात माणसे घेतली ती अशी :- मकबूल , मूहर्रम , मशहूर, असारून, फुसाद, मुराद आणि फत्तेबहाद्दूर हे होत. हे सर्व दरबारातून निघाले , त्यानंतर लोकांची फसवणूक करण्याकरता औरंगजेबाने सैफ खानाबरोबर चार हजार घोडेस्वार , स्वयंपाकाची भांडी व प्रवासाला लागणाऱ्या इतर वस्तू लादलेले उंट तयार ठेवण्यास सांगितले सगळीकडे जाहीर मात्र असे केले कि सैफखान लवकरच दाराला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात घेऊन जाणार आहे.
शिरच्छेद करण्याकरिता आलेले हे लोक खिजरबागेत संध्याकाळी सात वाजता येऊन पोहोचले . त्यांनी दारावर हात टाकला आणि काहीही दयामया न दाखविता त्याला खाली पडून त्याचे डोके कापले . धड तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडू देऊन ते शीर घेऊन झटपट औरंगजेबाकडे गेले. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते तो राजवाड्याच्या बागेत होता , शहाजहानचा लाडका मोठा मुलगा आणि मोगल साम्राज्याचा युवराज , लोकांना आदरणीय असलेला असा हा दुर्दैवी राजपुत्र दारा. त्याचा असा हृदयद्रावक रीतीने शेवट झाला.
दाराचे शीर येऊन पोहोचले आहे हे औरंगजेबाला समजताच त्याने ते एका थाळीत घालून बागेत आणण्यास सांगितले. तत्पूर्वी चेहऱ्यावरील व पागोट्यावरील रक्त साफ करून घेतले दिवे आणण्यास सांगितले. त्याच्या प्रकाशात राजपुत्र दाराच्या कपाळावरच्या खुणा तपासून पहिल्या . कारण त्याला खात्री करून घ्यावयाची होती कि हे शीर दाराचें आहे दुसऱ्या कोणाचे आहे. त्याची खात्री झाली कि मग त्याने ते खाली जमिनीवर ठेवण्यास सांगितले . आपल्या हातातील तलवारीने त्याने शिराला तीन वेळा डिवचले. औरंगजेबाने गुप्तपणे आज्ञा केली कि ते शीर पेटीत ठेऊन शहाजहानच्या कैदखाण्यावरील अधिकारी इतिबारखान यांच्याकडे पाठविण्यात यावे.
शहाजहान दारावर अतिशय प्रेम करीत असे त्या उलट औरंगजेबाला तो विचारीतही नव्हता. त्याचा सूड उगविण्यासाठी औरंगजेबाने वरील मसलत केली. जणू काय शहाजहानाला त्याला म्हणायचे होते " पहा , तुमच्या लाडक्याचा शेवट. तुम्ही ज्याला तुच्छ लेखत होता , तो आता साम्राज्याचा अधिकारी आहे आणि तुमचा आवडता दारा मृत्यू पावला आहे"
त्या रात्री औरंगजेबाची लाडकी बहीण रोशन आरा बेगम हिने मोठी मेजवानी दिली.
चित्र- मनुची संग्रह
संदर्भ - असे होते मोगल
- निकोलाय मनुची
-- संकलन
संतोष अशोक तुपे
Image may contain: 1 person

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...