Skip to main content

शिवचरित्रमाला भाग १७

अजिबात
प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी
गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी
पालकरांना त्यांनी सांगितले , ‘ ही गेलेली
ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात
प्रयत्न करू नका.
‘ या काळात महाराजांच्या सैन्यानं
खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही
हल्ला केला नाही. खानाला या काळात
महाराजांनी कधीही पत्र वा
राजकारणी बोलणी करण्यासाठी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला
नाही. अगदी गप्प राहिले. झडप
घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो ,
डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान
बुचकळ्यातच पडला होता. या
शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा
त्याला थांगपत्ताही लागत नव्हता.
पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम
खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर
कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या
पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या
प्रतापगडावर पाठविले. महाराजांना
डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा
हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर
पत्रही दिले होते. खानाची अशी
दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड
बोलणी होती की , ‘ प्रतापगडाहून
आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल
व्हा ,’ म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या
घशात येऊन पडा.
हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन्
कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय
कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या
खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने.
शरणागतीच्या भाषेत.
या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली
कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी
आणि तत्परतेने केली. याचवेळी
राजापूरच्या बंदरात , कोकणात
आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन
थांबली होती. जर युद्ध भडकले आणि
कोकणात पसरले तर अफझलखानाला या
गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग
व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते
सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे
पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर
खानाची छावणी , पुणे , सातारा ,
कोल्हापूर आणि सांगली या भागातील
आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष
खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत
होता. ही किमया महाराजांच्या
वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष
महाराजांच्या बोलण्याची.
या साऱ्याचा परिणाम ? पराभव
कुणाचा ?
Image may contain: 3 people

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...