Skip to main content

कोलकाताची ब्रिटिशकालीन स्मृतिचित्रे उलगडली!, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. 

 मुंबई : मुंबईप्रमाणेच देशातील प्रमुख शहरांना वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची जोड मिळाली आहे. त्यामुळे शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणांना भेट देण्याची संधी फार दुर्मीळ असते. मात्र नुकतेच कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने एका वेगळ्या धाटणीच्या प्रदर्शनातून कोलकाता शहराच्या इतिहासाशी ऋणानुबंध जोडणारे अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे.
कोलकाता १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘महालांचे शहर’ म्हणून ओळखले जात होते. कोलकाता लंडननंतर इंग्रजी साम्राज्याचे दुसरे मुख्य शहर बनले. इ.स. १७७३ पर्यंत कोलकाता इंग्रज भारताची राजधानी बनली तसेच ते साम्रज्याच्या शक्तीचे प्रदर्शन करणाºया
बºयाच सार्वजनिक इमारतींचे केंद्र बनले.
या ब्रिटिशकालीन कोलकाता शहराची स्मृतिचित्रे ‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ या प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी
महाराज वस्तुसंग्रहालयमध्ये प्रिंट्स अ‍ॅण्ड ड्रॉइंग गॅलरी येथे मांडण्यात आली आहेत.
फिरोजा गोदरेज आणि पॉलिन यांनी हे प्रदर्शन क्युरेट केले आहे. १८०० शतकातील या प्रिंट्सचा संग्रह आहे. या प्रिंट्स गतकाळातील कोलकाता शहराच्या वैभवाची आठवण करून देतात. हे प्रदर्शन या कलादालनात कलारसिकांसाठी वर्षभर सुरू राहणार आहे.
>‘कोलकाता वसाहतकालीन दृष्टिक्षेप’ हे प्रदर्शन १८व्या आणि १९व्या शतकातील प्रमुख इंग्रजी भूदृश्य चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांतील विकासशील कोलकाता शहर आणि तिची संस्कृती दर्शविते. या दालनात विषयगत संमिश्र प्रिंट्स बघायला मिळतात. या प्रदर्शनात सेंट जॉर्ज चर्च, जुने कोर्ट हाउस, हुगळी नदीकडून दिसणारे कोलकाता शहर, चांदपाल घाट आदी कोलकाता शहरातील ठिकाणांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे धोरण.

(लेखात शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र दिलेले आहे. सर्वांनी वाचावे हि आग्रहाची विनंती.) शिवाजी महाराजांनी जमिनीची पहिल्यांदा मोजणी आणि प्रतबंदी केली. प्रचितगड, राजापूर, रायगड, सुवर्णदुर्ग, अंजनवेल रत्नागिरी आणि विजयदुर्ग ह्या भागांतील प्रत्येकी दोन गावे निवडून तेथील उत्पन्नाचा तीन वर्षांचा अंदाज शिवाजी महाराजांनी काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर महाराजांनी धाऱ्याचे दर निश्चित केले. धाऱ्यापैकी निम्मा हिस्सा महाराज धान्यरूपाने घेत आणि निम्मा हिस्सा पैश्याच्या रूपाने घेत. ज्या ज्या तालुक्यांत धान्याचा जो भाव असेल तो भाव जमेस धरून त्याच्या आधारे रोकड साऱ्याची आकारणी महाराज करीत असत. भात आणि ताग यांचे जमिनीचे १२ वर्ग पाडण्यात आले होते. अव्वल हि पहिली प्रत, दुय्यम हि दुसरी, सिम हि तिसरी, आणि चार सिम हि चौथी प्रत. पहिल्या प्रतीचे १२ मन, दुसऱ्या प्रतीचे १० मन, तिसऱ्या प्रतीचे ८ मन, आणि चौथ्या प्रतीचे साडेसहा मन. ( सोळा पायल्या = एक मण आणि वीस मनाचे - एक खंडी) वाचकांस बाकीच्या प्रतींची माहिती असावी म्हणून फक्त नावे सांगतो. ५. राउपल- झुडपांची जमीन, ६. खारवट- समुद्र व नदीच्या...

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...