Skip to main content

अपरिचित इतिहास.

भूषणा बद्दल एक आख्यायिका(दंतकथा) आहे की तो रायगडावरून परत उत्तरेत गेल्यावर तो शिवाजी महाराजांच्या स्तुतीचे छंद म्हणू लागला. हा सर्व प्रकार औरंगजेब ला समजल्यवर त्याने चिंतामणी या भूषणाच्या भावाच्या मध्यस्तीने भूषणास दरबारात बोलवले व औरंगजेब म्हणाला शिवाजी हा राजा आहे त्याचे मांडलीक राजांतच वर्णन कर. पण भूषण हा प्रतिभावंत कवी होता. त्याने औरंगजेबाच्या ऐकेका मनसबदाराला एक एक फूलाची उपमा दिली व औरंगजेब भूंग्या सारखा या सर्व फूलांतून मध जमा करतो पण शिवाजी राजे हे चाफ्याच्या फुला प्रमाणे आहेत चाफ्यात मध नसत म्हणून भूंगा त्याच्या वाटेला जात नाही तद्वतच औरंगजेब शिवरायांच्या वाटेला कधी जात नाही असे वर्णन केले. भूषणा ने म्हटले. कछवाहे म्हणजे जयपूरचे राजे कमळा प्रमाणे, कबंधज म्हणजे जोधपूरचे राजे कदंबाप्रमाणे, गौर गुलाबा प्रमाणे, राणा म्हणजे उदेपूरचे राणे केतकीपुष्पाप्रमाणे, पवार पांढरीच्या फुलाप्रमाणे, चंदावत जूईच्या फुलासारखे, बुन्देले चमेलीप्रमाणे, बडगुजर मुचुकुंद प्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणा-या सर्व पुष्पसमुहाप्रमाणे आहेत. औरंगजेबरूपी भ्रमर ह्या सर्व फुलांतून रसपान करतो म्हणजे चौथाई घेतो पण शिवराय हे चाफ्याच्या फुला सारखे आहेत त्यामूळे औरंगजेब त्यांच्या वाट्याला कधी जात नाही.
Image may contain: 9 people, people smiling

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्कर...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].