Skip to main content

शिवचरित्रमाला भाग ३०

*प्रचीत गडावरील धनलाभ.*
गमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर
शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव
महाराजांनी जिंकलं.
जिंकण्यासाठी युद्ध करायची
वेळच आली नाही.
तेथील शाही जाहगिरदार
महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला.
त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले.
गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक
प्रचंड डोंगरी किल्ला होता. त्याचं नाव
प्रचीतगड. गडावर आदिलशाही
सत्ता होती. तानाजी
मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच
छाप्यात किल्ला घेतला. केवढं नवल! सहा सहा महिने
लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक
दिवसभरही झुंजवता आले
नाहीत. मराठ्यांनी गड घेतला.
झेंडा लागला. महाराजांना विजयाची वार्ता
गेली. ते पालखीतून
प्रचीतगडावर निघाले. बरोबर थोडं
मावळी सैन्य होतं. महाराज गडावर
पालखीतून येत आहेत हे पाहून गड
जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला. आपला विजय
बघण्यासाठी खास महाराजस्वारी
जातीनं येत आहे हा खरोखर दुमिर्ळ योग
होता. तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून
आल्यासारखं झालं. गडावरचे लोक गर्जत होते ; वाद्य
वाजत होते. महाराज गडावर आले.
दरवाज्यातून आत प्रवेशले. मावळ्यांना आनंदाचं उधाण
आलं होतं. जणू इथूनच महाराजांची
पालखीमधून त्यांनी मिरवणूक
सुरू केली. महाराज लोकांचे स्वागत
हसतमुखाने स्वीकारीत
पालखीत बसले होते. यावेळी
वारा सुटला होता. भळाळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडपं हेलावत
होती. महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत
होता. नकळत शेल्याचा फलकावा
पालखीबाहेर लोंबत होता. तो वाऱ्याने उडत
होता. मिरवणूक चालली होती.
एवढ्यात गचकन कुणीतरी मागे
खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा
हिसका बसला. शेला खेचला गेला. ते पाहू लागले. भोई
थांबले. काय झालं तरी काय ? पाहतात तो
महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं
टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं
गेलं होतं. बोरीला काटे असतात. शेला
अटकला. महाराज बघत होते. त्यांना गंमत
वाटली.
मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले. शेला
निघाला. पण महाराज हसून सहज गंमतीने
म्हणाले , ‘ या बोरीनं मजला थांबविले. येथे
खणा ‘ मावळ्यांनी पहारी ,
फावडी आणली आणि
त्यांनी बोरीखालची
जमीन खणावयास सुरुवात
केली. केवळ गंमत म्हणून महाराज
बोलले. सगळ्यांचाच उत्साह दांडगा. अन् खणताखणता
पहारी लगेच अडखळल्या.
माती दूर केली. बघतात तो
सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ
योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन
मिळाले. ते धन कुठे गेले ? महाराजांच्या
घरी ? ‘ कमिशन ‘ म्हणून
काही ‘ हप्ते ‘ कोणाकोणाला मिळाले का ?
नाही , नाही ,
नाही! हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात
जमा झाले.
इथे एक गोष्ट लक्षात येते. महाराजांना एकूण
तीन ठिकाणी असे
भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर ,
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे
असं प्रचीतगडावर. हे धन स्वराज्याचं.
म्हणजेच रयतेचं. म्हणजेच देवाचं.
पूवीर् महाराजांच्या आजोबांना , म्हणजे
मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या
शेतातच भूमीगत धन मिळालं. ते
मालोजींनी
श्रीधृष्णेश्वराचे मंदिर , शिखर शिंगणापूरचा
तलाव , एक यात्रेकरूंच्यासाठी
धर्मशाळेसारखी म्हणा किंवा
मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच
लोकोपयोगी कार्यासाठी खर्च
केलं. आपल्या आजोबांचा हा वारसा
महाराजांनी आजही सांभाळला.
योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं
धन मालोजीराजांनी आणि आता
शिवाजीराजांनी जनताजनार्दनाच्या
पायांपाशी ‘ श्रीकृष्णार्पणमस्तु
‘ म्हणत खजिन्यात जमा केलं. देवाचं दान आण
जनतेचं धन असेच वापरावयाचे असते. त्याचा अपहार
करणे हे महत्पाप.
एक गोष्ट सांगू का ? महाराजांच्या हिंदवी
स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज
कधीही नव्हते. किंवा
खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी
अवस्थाही कधी निर्माण
झाली नाही. याचे एक कारण
समजले ना ? अपहार , भ्रष्टाचार , पिळवणूक ,
लुबाडणूक हे शब्दच स्वराज्यात असता कामा नये हा
आदर्श महाराजांनी घालून दिला. स्वराज्याचा
खजिना नेहमीच शिलकीचा
होता.
जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्हाला
आवर्जून सांगितलं आहे की ,
‘ जीहुनिया धन उत्तम वेव्हारे
उदासविचारे वेंच करी ‘
चांगल्या मार्गाने , खूप धन मिळवा आणि उदार मनाने
खर्चही करा , हा महराजांचा आदेश होता
आणि आहे.
प्रचीतगडची ही
तानाजीची मोहिम इ. १६६१
च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].