Skip to main content

शिवचरित्रमाला भाग २६

*एक भीषण गनिमी कावा*
शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि
गनिमी काव्याचा कधी विचारच
केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून
त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो
चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने
आराम केला. आपल्या
छावणीतील सर्व बातम्या
मराठी हेरांच्या मार्फत
शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत ,
याची त्याला कल्पनाही
नसावी. त्याने जानेवारी १६६१
मध्ये एक मोठी मोहीम
कोकणातील मराठी प्रदेशावर
करण्याचा आराखडा आखला.
या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या
सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर
अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात
सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन
ही हुशार , वऱ्हाडी
सरदारीणही होती.
खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध
नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा
कमी नक्कीच नव्हता.
शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा
भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा
अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता
की , त्याने म्हटले की , ‘
हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी
काबीज करतोच , पण
कोकणातील शिवाजींचे कल्याण
भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे)
असलेली सारी
ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.
‘ कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि
युद्धतयारीचाही
तपशील महाराजांना राजगडावर अचूक
पोहोचला। जानेवारीच्या शेवटच्या
आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार
आहोत , आपला मार्ग कोणचा ,
शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे.
इत्यादी कोणतीही
माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना
सांगितली नाही. ही
गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या
सरदारणीला आश्चर्याची
वाटली. शिवाजी ,
सह्यादी , मावळे , गनिमी कावा
आणि कोकणी प्रदेश याची तिला
चांगली जाण होती. पण तिने
कारतलबशी एका शब्दानेही
चर्चा वा विचारणा केली नाही.
पण हा खान अंधारात उडी मारतोय ,
नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज
तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला.
खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात
उतरणारी
आंबेनळीची वाट
धरली। खानाचे सैन्य
सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत
अगदी अनभिज्ञ , म्हणजेच
अडाणी होते. आंबेनळीच्या
पायथ्याशी चावणी नावाचे
बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान
पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात
जाणारी अरुंद वाट होती. गर्द
जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या
डोंगरातून ही वाट जात होती.
ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५
किलोमीटर अंतराची
होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला
चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे
होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी
१६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने
चालू लागली. त्यांना कल्पना
नव्हती की , पुढे काय वाढून
ठेवले आहे.
पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर
झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी
महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५
किलोमीटरच्या गर्द झाडीत
कमीतकमी पाच हजार मावळे
जागोजागी
खाचीकपारीत आणि झाडांच्या
दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले
होते. ही फौज वाघांच्या जाळीत
मेंढरांनी शिरावं , तशी
चालली होती.
शिवाजीराजांना या
शत्रूचालीची खबर सतत
समजत होती. त्यांच्या मनात
कोवळी दया उपजली.
ही सारी मोगली
फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं.
महाराजांना दया आली असावी
ती त्या सावित्रीबाई
रायबाघनची. महाराजांनी आपला
एक वकील वेगळ्या माहितीच्या
वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान
चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण
पिछाडीस होता. रायबाघनही
तेथेच होती. मराठी
वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने
अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ‘
आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण
अजूनही त्वरित माघारी निघून
जावे , नाहीतर वेळ कठीण
आहे. आमची विनंती
ऐकावी.
‘ यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला
की , ‘ मी काय निघून जायला
आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं
दख्खन कोकण काबीज करणार आहे
मी.
हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर
असलेली रायबाघन ऐकत होती.
ती काहीही बोलत
नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश
फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले.
वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने
त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या
महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे
महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द
ऊंबरखिंडीत
ठायीठायी दबा धरून बसलेल्या
मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा
पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो
मावळ्यांनी खालून चाललेल्या
मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा
सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू
झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून
बाण येताहेत हेच समजेना , गनिमी
काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश:
हलकल्लोळ उडाला. मोगलांना धड पुढेही
जाता येईना अन् मागेही येता येईना ,
तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या
यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ
माजला. याचे नाव गनिमी कावा.

Comments

Popular posts from this blog

शिवरायांच्या इतिहासातील कुप्रसिद्ध रांझ्याच्या पाटलाचं गाव.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला सुरुवात केलीकी महाराजांसोबत औरंगजेब, शाहिस्तेखान आणि अफजलखान व अनेक स्वराज्याचे शत्रू पक्ष देखील आपल्या आयुष्याचे भाग होतात ,त्यात अजून एक नाव म्हणजे 'रांझे गावचा पाटील'. रांझे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत बदअमल केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुजोर बाबाजी गुजर यांच्या वर खटला चालवून चौरंग केला. (चौरंग करणे म्हणजे हात पाय कलम करणे). या संदर्भाचे २८ जानेवारी १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र पण मध्यंतरी उजेडात आले. महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मनाला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे, व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड-शिवापूर गावा पासून अवघ्या ३ की.मी. वर असलेले सह्याद्रीच्या कुशीतील छोटंसं रांझे गाव. रांझे गावात रांझेश्वराचे सुंदर मंदिर आहे पण बाहेरील बाजूने काहीशी दुरावस्था झालेली दिसते. मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते.मंदिरात...

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ब्राह्मणांचे स्थान !

‘काही वर्षांपूर्वी जेम्स लेन नावाच्या पाश्‍चात्त्य लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राविषयी एक आक्षेपार्ह पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कलह निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. अलीकडेच पुण्यात जात्यंध मराठा संघटनांनी ब्राह्मणद्वेषाचा कळस गाठून लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्याचे दुष्कृत्य केले. ‘छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’, हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत. १. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच ! अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्त...

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [ ⟶ रामदास].